राज्यात लोकसभेचे तिन्ही टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडल्याने आदर्श आचारसंहिता अशंत: शिथील करण्याचे निवडणूक आयोगाने मान्य केल्याने राज्य सरकारला महत्त्वाचे निर्णय घेण्यास मोकळीक मिळणार आहे.
आचारसंहिता शिथील करावी, अशी विनंती राज्य सरकारच्या वतीने निवडणूक आयोगाला करण्यात आली होती. मतदान प्रक्रिया पूर्ण झाली असली तरी अहवाल तयार करणे किंवा कोठे फेरमतदानाची गरज भासणार नाही याची खातरजमा करून येत्या एक-दोन दिवसांत आचारसंहिता शिथील केली जाईल. देशाच्या अन्य भागांमध्ये अद्यापही मतदान बाकी असल्याने सरकारला धोरणात्मक निर्णय घेता येणार नाही. दैनंदिन कामकाजाच्या संदर्भात महत्त्वाचे निर्णय घेणे शक्य होईल, असे निवडणूक आयोगाच्या उच्चपदस्थांकडून सांगण्यात आले. सरकारी किंवा निमशासकीय वाहने वापरण्यावरील निर्बंध कायम राहणार आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 26th Apr 2014 रोजी प्रकाशित
आचारसंहिता अंशत: शिथील
राज्यात लोकसभेचे तिन्ही टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडल्याने आदर्श आचारसंहिता अशंत: शिथील करण्याचे निवडणूक आयोगाने मान्य केल्याने राज्य सरकारला महत्त्वाचे निर्णय घेण्यास मोकळीक मिळणार आहे.
First published on: 26-04-2014 at 03:08 IST
TOPICSआदर्श आचारसंहिताModel Code Of Conductलोकसभा निवडणूक निकाल २०२४ (Lok Sabha Election Result 2024)Lok Sabha Election
मराठीतील सर्व लोकसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Poll code partly relaxed