महाराष्ट्रात २६०८ नवे करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील रुग्णांची संख्या ४७ हजार १९० इतकी झाली आहे. तर मागील २४ तासांमध्ये ६० जणांचा करोनाची बाधा होऊन मृत्यू झाला आहे. मागील २४ तासांमध्ये ८२१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत महाराष्ट्रात १३ हजार ४०४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे. 2608 new #COVID19 positive cases, 60 deaths and 821 discharged in Maharashtra today. The total number of positive cases in the state now stands at 47910, including 1577 deaths and 13404 discharged: Maharashtra Health Department pic.twitter.com/BeDXq3dJRw — ANI (@ANI) May 23, 2020 राज्यात आज 2608 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता 47190 अशी झाली आहे. आज नवीन 821 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 13404 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 32201 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.#CoronaVirusUpdates #MeechMazaRakshak — Rajesh Tope (@rajeshtope11) May 23, 2020 आज झालेल्या ६० मृत्यूंपैकी ४० मृत्यू मुंबईत, १४ पुण्यात, २ सोलापुरात, १ वसई-विरारमध्ये, १ सातऱ्यात, १ ठाण्यात आणि १ नांदेडमध्ये नोंदवला गेला आहे. ज्या ६० जणांचा मृत्यू झाला आहे त्यामध्ये ४१ पुरुष आणि १९ महिला होत्या. ६० पैकी २९ रुग्ण हे ६० वर्षे किंवा त्यावरील वयाचे होते. तर २४ रुग्ण हे ४० ते ५९ या वयोगटातले होते. इतर ७ जण हे ४० वर्षांपेक्षा कमी वयाचे होते. मागील २४ तासांमध्ये झालेल्या ६० मृत्यूंपैकी ३६ रुग्णांना मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग असे गंभीर आजार होते. आत्तापर्यंत राज्यात १५७७ रुग्णांचा मृत्यू करोनामुळे झाला आहे. आत्तापर्यंत ३ लाख ४८ हजार २६ जणांची करोना चाचणी करण्यात आली. त्यापैकी २ लाख ९८ हजार ६९६ जणांच्या चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत. तर ४७ हजार १९० जणांच्या चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. सध्याच्या घडीला राज्यात ४ लाख ८५ हजार ६२३ लोक होम क्वारंटाइन आहेत. तर ३३ हजार ५४५ जणांना संस्थात्मक क्वारंटाइन ठेवण्यात आलं आहे अशीही माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.