नांदेड, औरंगाबाद, उस्मानाबाद, बीड, हिंगोली, लातूरसह मराठवाडय़ात सर्वत्र शनिवारी पारा ४१-४२च्या पुढे गेला. नांदेडला यंदाचे ४४.५ अंश सेल्सिअस, परभणी ४३.५ तसेच उस्मानाबादलाही यंदाच्या सर्वाधिक ४२.०३ तापमानाची नोंद झाली. औरंगाबाद ४०.९, बीड ४१, हिंगोली ४२ या प्रमाणे शनिवारचे तापमान नोंदविले गेले. मे महिन्याचा शेवटचा आठवडा सुरू होत असताना भाजून काढणाऱ्या उन्हामुळे संपूर्ण मराठवाडय़ात लोक चांगलेच हैराण झाले आहेत.
सकाळी नऊपासूनच उन्हाच्या असह्य़ झळा जाणवत असल्याने रस्त्यावर शुकशुकाट असतो. बाजारपेठाही संध्याकाळी सातनंतर गजबजत आहेत. शासकीय, निमशासकीय कार्यालयांतील गर्दीही तुरळक दिसत आहे. वाढत्या तापमानामुळे नारळ पाणी, ज्यूस, िलबू शरबत तसेच शीतपेयांच्या विक्रीत लक्षणीय वाढ झाली आहे. उन्हाचा फटका टाळण्यासाठी नागरिकही घराबाहेर पडण्यास तयार नाहीत. नागरिकांनी पुरेशी काळजी घ्यावी. शक्यतो दुपारच्या प्रहरी घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रसिद्ध वैद्यकीय अधिकारी डॉ. साहेबराव मोरे यांनी केले. गरज नसल्यास घराबाहेर पडू नये किंवा बाहेर पडल्यास िलबू पाणी, नारळ पाणी व इलेक्ट्राल पावडरचा वापर करावा, असेही त्यांनी म्हटले.

Kolhapur, Hatkanangle, election battle,
कोल्हापूर, हातकणंगलेत चुरस वाढली
halicopter
महायुती विरुद्ध आघाडी लढत; पूर्व विदर्भात पहिल्या टप्प्यात पाच लोकसभा मतदारसंघांत उद्या मतदान
Solapur recorded the highest degree Celsius maximum temperature in the state
दोन दिवस होरपळीचे! विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा, रात्रीच्या उकाडय़ातही वाढीचा अंदाज
Meteorological department predicted heat wave in Raigad Thane Palghar along with Mumbai Pune
मुंबईसह रायगड, ठाणे, पालघरमध्ये उकाडा वाढणार; यवतमाळ, अकोला, चंद्रपुरात तीन दिवस उष्णतेची लाट