प्रशांत देशमुख

वर्धा जिल्ह्यातून जाणाऱ्या महामार्गावर आज सकाळी झालेल्या अपघातात दोन जण ठार तर सहा जण जखमी झाले आहेत.

नागपूर-हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावर वर्धा सीमेजवळ केमिकल पावडर घेऊन नागपूरकडे भरधाव वेगाने जात असलेल्या ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक अनियंत्रित होऊन नाल्यात पलटी झाल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली.

रामनरेश सोनी (वय ३१), राजेश वाकोडे (वय ४०) या दोघांचा या अपघातात मुत्यू झाला आहे. तर विरेंद्रकुमार पटेल, निलेशकुमार त्रिपाठी, अंकितकुमार गुप्ता, राकेश यादव, जोगासिंग धुम्मन, उमेश विश्वक्रमा हे सहा जण गंभीर जखमी झाले आहे. अपाघाताची माहिती महामार्ग पोलिसांना मिळताच जाम पोलिस चौकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत कऱ्हाडे, ज्योती राऊत, गणेश पवार यांनी घटनास्थळी धाव घेऊन सर्व जखमींना नागपूर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.