यवतमाळमध्ये रविवारी (४ डिसेंबर) एका एसटी बस आणि कारचा भीषण अपघात झाला. यात चार जणांचा जागीच मृत्यू झाला, तर १३ जण गंभीर जखमी झाले आहेत. कार अमरावतीकडे जात होती, तर एसटी बस यवतमाळकडे जात होती. यावेळी यवतमाळच्या नेरजवळील लोणी गावाजवळ कार आणि बसची भीषण धडक झाली.

या घटनेत राजेश इंगोले (यवतमाळ), रजनी इंगोले (यवतमाळ), वैष्णवी गावंडे (वाशिम) आणि सारीखा चौधरी (पुसद, यवतमाळ) या चौघांचा मृत्यू झाला. हा अपघात एवढा भीषण होता की, कारमधील चौघे जागीच ठार झाले. बसमधील १३ जण गंभीर जखमी झाले.

houses sold in Mumbai
मुंबईमध्ये फेब्रुवारीत ११ हजार ८३६ घरांची विक्री, मागील १२ वर्षांतील फेब्रुवारीमधील सर्वाधिक घरविक्री
Maharashtra State Electricity Board, Contract Workers, Strike, Supported, Permanent Employees organization
राज्यात वीज चिंता! कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात ७ कायम संघटनांची उडी
ex intel director avtar saini dies in cycle accident
‘इंटेल’च्या माजी अधिकाऱ्याचा सायकल अपघातात मृत्यू ; नवी मुंबईतील पामबिच मार्गावरील दुर्घटना
Army soldier died in accident Amravati district
अमरावती : लष्करात सेवा बजावून सुटीवर घरी आला आणि अपघातात गेला….

हेही वाचा : धुळे: लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या बसला अपघात; दोघांचा मृत्यू तर २५ जण जखमी

नेर येथील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.