सांगली : जत तालुक्यातील कोसारी येथे शेत जमिनीतील विहिरीच्या पाण्यावरुन भावकीमधील एका कुटुंबावर झालेल्या हल्ल्यात दोन जण जागीच ठार झाले तर चौघेजण गंभीर जखमी झाले आहेत. शनिवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास अचानक घडलेल्या या हल्ल्यामुळे कुंभारी परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. विलास नामदेव यमगर (वय-४५) व प्रशांत दादासो यमगर (वय-२३) या चुलत्या-पुतण्याचा हल्ल्यात जागीच मृत्यू झाला आहे.तर जखमींमध्ये दादासो नामदेव यमगर, यशवंत भाऊ खटके, विजय विलास यमगर व एका महिलेचा समावेश आहे. या चौघांवर देखील जत येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या घटनेची माहिती मिळताच जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश रामाघरे यांच्यासह मोठा पोलीस फाटा कोसारी येथे दाखल झाला आहे. या घटनेने गावात प्रचंड मोठा तणाव निर्माण झाला आहे. कोसारी पासून पाच किलोमीटर अंतरावर महानोरवाडी येथे यमगर कुटुंबीयांची शेती आहे. या शेतीतील विहिरीतील पाण्याच्या पाळीवरून हा वाद झाल्याचे समजते. शनिवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास यामगर यांच्या भवकितीलच संशयित दहा ते बारा हल्लेखोरांनी यमगर कुटुंबावर तलवार, चाकू, कुऱ्हाड, दगड, दांडक्यांनी जोरदार हल्ला केला. यात दोन जण ठार तर तीन जण जखमी झाले. घटनेनंतर आरोपींनी पलायन केले आहे. पोलीस तपासाची चक्री गतीने फिरवत आहेत.