scorecardresearch

Premium

“शिवाजी महाराजांसारखं न्यायाप्रिय शासन अहिल्याबाई होळकर यांनी चालवलं”, देवेंद्र फडणवीसांचं चौंडीत विधान

फडणवीस म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काशीत कॉरिडर करताना राज्य कोणासारखं चालवायचं, तर..”

devendra fadnavis
देवेंद्र फडणवीस चौंडीत बोलत होते.

अहमदनगर जिल्ह्याला अहिल्यानगर म्हणून नाव देण्याची मागणी होत आहे. आपलं हिंदुत्ववादी विचारांचं सरकार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव सांगणारे आपण आहोत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात छत्रपती संभाजीनगर आणि धारशिव नामकरण केलं आहे. तुमच्याच नेतृत्वात अहिल्यानगर झालं पाहिजे. मुख्यमंत्री छत्रपतींचे मावळे आहेत, त्यामुळे अहिल्यानगर होणारच, असं विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते चौंडीत बोलत होते.

“देशाच्या इतिहासात आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण देतो की न्यायप्रिय राजा. तशाप्रकारचं न्यायप्रिय शासन राजमाता अहिल्याबाई होळकर यांनी चालवलं,” असं फडणवीसांनी म्हटलं.

Fire at Wedding Hall in Iraq
लग्नाच्या हॉलमध्ये भीषण आग, वधू-वरासह १०० जणांचा होरपळून मृत्यू, १५० हून अधिक जखमी
Parineeti troll
“ही तर हद्द झाली…,” लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी परिणीती चोप्रा ट्रोल, अभिनेत्रीबद्दल नाराजी व्यक्त करत नेटकरी म्हणाले…
IND vs AUS: It's not easy to hit the ball where there is no fielder Aussie legend Mark Waugh's big statement on Suryakumar
Suryakumar Yadav: “फिल्डर नसलेल्या ठिकाणी चेंडू मारणे…”, ऑस्ट्रेलियन दिग्गज ‘मार्क वॉ’ चे सूर्यकुमारबाबत मोठे विधान
Pankaja Munde Narendra Modi
“हा तुमचा पक्षाला इशारा आहे का?”, पंकजा मुंडे स्पष्टच म्हणाल्या, “मी त्यांना…”

“२२ वेगवेगळ्या योजनांचा लाभ धनगर समाजाला करून दिला”

“पावसाळ्यात चराईत जमीन आम्हाला नेमून द्या, ही गेल्या २५ वर्षाची मागणी होती. ती पूर्ण करत मेंढपाळांना चराई राखून ठेवण्याचं काम आमच्या सरकारनं केलं. तरुण-तरुणींसाठी वेगवेगळ्या योजना केल्या. धनगरवाड्यांना जोडण्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद केली. २२ वेगवेगळ्या योजनांचा लाभ धनगर समाजाला करून दिला,” असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं.

हेही वाचा : फडणवीसांच्याही जन्माआधीचा प्रकल्प ५३ वर्षांनी पूर्णत्वास, निळवंडे धरणाच्या कालव्यात पाणी चाचणी; उपमुख्यमंत्री म्हणाले…

“धनगर समाजासाठी दरवर्षी २५ हजार घरे”

“युतीचं सरकार असताना एक हजार कोटी रुपयांच्या निधीला मंजूरी देत कामाला सुरुवात झाली. पण, महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर एक फुटकी कौडी त्यातील मिळाली नाही. एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात सरकार आल्यानंतर पुन्हा जीआर काढत १ हजार कोटी रुपये देण्याचं काम केलं. धनगर समाजासाठी दरवर्षी २५ हजार घरे बांधण्याचा निर्णय घेतला आहे. वाड्या वस्त्यांमध्ये राहणाऱ्या धनगरांना बेघर राहू देणार नाही,” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

हेही वाचा : अहमदनगरचं नाव ‘अहिल्यादेवी होळकर नगर’ होणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा!

“शिवाजी महाराज अहिल्याबाई होळकर यांनी दाखवलेल्या मार्गावर सरकार काम करते”

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काशीत कॉरिडर करताना राज्य कोणासारखं चालवायचं, तर राजमाता यांच्यासारखं चालवायचं सांगितलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता अहिल्याबाई होळकर यांनी दाखवलेल्या मार्गावर सरकार काम करत राहिल,” असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 31-05-2023 at 17:11 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×