मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी जालन्यात येऊन आंदोलनस्थळी भेट घ्यावी, अशी मागणी केली. यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार आज (१३ सप्टेंबर) सायंकाळी ५ वाजता मनोज जरांगेंना भेटायला जालन्याला जाणार असल्याचं वृत्त आहे. यावर मनोज जरांगेंनी पहिली प्रतिक्रिया दिली. तसेच यानंतर उपोषण सोडणार की नाही यावरही भाष्य केलं.

मनोज जरांगे म्हणाले, “काही हरकत नाही, त्यांनी मला भेटायला यावं. मात्र, ते भेटायला येणार आहे की नाही याबाबत माझ्याकडे खात्रीलायक माहिती नाही. ते आले तर त्यांचं मराठा समाजाच्या वतीने स्वागत आहे. आम्ही त्यांना एक महिन्याचा वेळही दिला आहे. ते इथे आल्यावर त्यांच्याशी आम्ही मराठा आरक्षणावर पुन्हा चर्चा करूच.”

Sharad Pawar Reaction on saif ali khan
Sharad Pawar : सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर शरद पवारांची प्रतिक्रिया; गृहमंत्र्यांकडे बोट दाखवत म्हणाले…
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Suresh Dhas On Santosh Deshmukh Case
Suresh Dhas : “राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्य मुन्नीला बोलायला लावा?”, सुरेश धस यांचं विधान, रोख कुणाकडे? परळी पॅटर्नचा उल्लेख करत म्हणाले…
Sanjay Raut Answer to Eknath Shinde
Sanjay Raut : “बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी कुणी गद्दारी केली हे…”, संजय राऊत यांचं एकनाथ शिंदेंना उत्तर
Manoj Jarange
Manoj Jarange : मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांना सवाल, “खंडणीतला आरोपी तुमचं सरकार….”
Image of Ajit Pawar
Ajit Pawar : “पक्ष वगैरे न बघता…” धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर अजित पवारांची मोठी प्रतिक्रिया
Ajit Pawar discussion with Amit Shah in Delhi
अजित पवारांची दिल्लीत अमित शहांशी चर्चा
Sarangi Mahajan Serious Allegations on Dhananjay and Pankaja Munde
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप, “धनंजय आणि पंकजाने माझी साडेतीन कोटींची जमीन हडप केली, वाल्मिक कराड…”

“आमची मूळ मागणी मराठा आरक्षणाची”

“आमची मूळ मागणी मराठा आरक्षणाची, कुणबी प्रमाणपत्राची आहे. हीच मागणी ते भेटायला आल्यावर पुन्हा त्यांच्यासमोर करेन,” असंही मनोज जरांगेंनी नमूद केलं.

हेही वाचा : “सरकारला मनोज जरांगे पाटलांना संपवायचं आहे, त्यांना…”; संजय राऊतांचा गंभीर आरोप

“ही जागा सोडण्याचा प्रश्नच येत नाही”

मराठा समाजाला ३० दिवसात आरक्षण मिळेल, असं आश्वासन मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांनी दिलं तर तुम्ही ही जागा सोडणार का, उपोषण सोडणार का? या प्रश्नावर मनोज जरांगे म्हणाले, “नाही, ही जागा सोडण्याचा प्रश्नच येत नाही. त्यांना भेटायला वेळ हवा होता, तो वेळ मी दिला.”

Story img Loader