मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी जालन्यात येऊन आंदोलनस्थळी भेट घ्यावी, अशी मागणी केली. यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार आज (१३ सप्टेंबर) सायंकाळी ५ वाजता मनोज जरांगेंना भेटायला जालन्याला जाणार असल्याचं वृत्त आहे. यावर मनोज जरांगेंनी पहिली प्रतिक्रिया दिली. तसेच यानंतर उपोषण सोडणार की नाही यावरही भाष्य केलं.

मनोज जरांगे म्हणाले, “काही हरकत नाही, त्यांनी मला भेटायला यावं. मात्र, ते भेटायला येणार आहे की नाही याबाबत माझ्याकडे खात्रीलायक माहिती नाही. ते आले तर त्यांचं मराठा समाजाच्या वतीने स्वागत आहे. आम्ही त्यांना एक महिन्याचा वेळही दिला आहे. ते इथे आल्यावर त्यांच्याशी आम्ही मराठा आरक्षणावर पुन्हा चर्चा करूच.”

Pimpri, eknath shinde, eknath shinde latest news,
पिंपरी: मुख्यमंत्री आले अन् काहीही न बोलता निघून गेले…
Mahayutis Srirang Barne Show of Power An 80-year-old lady Shiv Sainik also participated in rally
महायुतीच्या श्रीरंग बारणेंचं शक्ती प्रदर्शन; ८० वर्षाच्या कट्टर शिवसैनिक आजीही रॅलीत सहभागी
Udayanraje bhosle show of power tomorrow in Satara
उदयनराजेंचे उद्या गुरुवारी मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह साताऱ्यात जोरदार शक्ती प्रदर्शन
Chief Minister Eknath Shinde
“मला रोज फोन यायचे, साहेब त्यांना काहीतरी सांगा”; शिवतारेंच्या निवडणूक लढवण्याच्या भूमिकेवर मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितला किस्सा

“आमची मूळ मागणी मराठा आरक्षणाची”

“आमची मूळ मागणी मराठा आरक्षणाची, कुणबी प्रमाणपत्राची आहे. हीच मागणी ते भेटायला आल्यावर पुन्हा त्यांच्यासमोर करेन,” असंही मनोज जरांगेंनी नमूद केलं.

हेही वाचा : “सरकारला मनोज जरांगे पाटलांना संपवायचं आहे, त्यांना…”; संजय राऊतांचा गंभीर आरोप

“ही जागा सोडण्याचा प्रश्नच येत नाही”

मराठा समाजाला ३० दिवसात आरक्षण मिळेल, असं आश्वासन मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांनी दिलं तर तुम्ही ही जागा सोडणार का, उपोषण सोडणार का? या प्रश्नावर मनोज जरांगे म्हणाले, “नाही, ही जागा सोडण्याचा प्रश्नच येत नाही. त्यांना भेटायला वेळ हवा होता, तो वेळ मी दिला.”