लोकसत्ता प्रतिनिधी

सोलापूर : इंडिया आघाडीचे भवितव्य काँग्रेसच्या ताठरपणामुळेच धोक्यात आले असून इंडिया आघाडीची वाटचाल जवळपास संपुष्टात आली आहे, असे मत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले.

kiren rijiju controversial remarks on rahul gandhi
राहुल गांधींसारखे विरोधी पक्षनेते देशाला शाप! संसदीय कामकाजमंत्री किरेन रिजिजू यांची टीका
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
ncp sharad pawar peace walk in mumbai
मंत्रालयासमोर ‘राष्ट्रवादी’ची शांतता पदयात्रा
Sharad Pawars big statement about increasing oppression of women
महिलांवरील वाढत्या अत्याचाराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य, म्हणाले…
Prakash Ambedkar criticism of Jarange Patil over the election
जरांगेंनी निवडणूक लढवली नाही, तर ते पवारांच्या इशाऱ्यावरील हे स्पष्ट; ॲड.प्रकाश आंबेडकर यांचे टीकास्त्र
‘वंचित’च्या निदर्शनांची दिशा काय?
Babasaheb Ambedkar, Shyam Manav,
आम्ही बाबासाहेब आंबेडकरांचे वैचारिक पुत्र आणि ते…
Dr. Babasaheb Ambedkar
Anna Sebastian: कामाच्या अतिताणामुळे तरुणीचा मृत्यू; डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कामगार कायद्यात केलेल्या सुधारणा या निमित्ताने चर्चेत!

माढा येथे ओबीसी मेळाव्यासाठी आलेले असता आंबेडकर यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी बोलताना त्यांनी काँग्रेसवर आगपाखड केली. ते म्हणाले, काँग्रेसकडून एका म्यानात दोन तलवारी ठेवण्याचे काम सुरू आहे. राहुल गांधी हे एकीकडे भारत जोडो न्याय यात्रेच्या माध्यमातून काँग्रेसची ताकद वाढविण्याचा प्रयत्न करीत आहेत, तर दुसरीकडे इंडिया आघाडीसाठी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पुढे केले जात आहे. भारत जोडो न्याय यात्रा पश्चिम बंगाल, बिहारमधून जाणार असताना तेथील तृणमूल काँग्रेस, जनता दल युनायटेड आदी पक्षांना सामावून घेण्याची अपेक्षा होती. परंतु त्याउलट घडामोडी घडत आहेत.

आणखी वाचा-“वीर सावरकर पळपुटे, आम्ही..”, खासदार इम्तियाज जलील यांची टीका, नव्या वादाची चिन्हं

राज्यात महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीला सामावून घेण्यासाठी येत्या ३० जानेवारी रोजी आम्हांला महाविकास आघाडीने चर्चेचे निमंत्रण दिले आहे. त्यानुसार आम्ही चर्चेसाठी जाणार आहोत. यात काही विषयांवर मतभेद होत असतिल तर ते चर्चेतूनच सोडविण्याचा प्रयत्न करू. इंडिया आघाडीसारखी अवस्था निदान राज्यात महाविकास आघाडीची तरी होऊ नये, अशी आपली प्रामाणिक भावना आहे, असे आंबेडकर यांनी सांगितले.