पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास गेल्यानंतर सर्वात प्रथम पाणी हवे का अशी विचारणा ठाणे अंमलदाराकडून या पुढे होईल, तशा सूचना ठाणा प्रभारींना देण्यात आल्याची माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी शुक्रवारी पत्रकार बैठकीत दिली.गेले चार दिवस सांगली जिल्हा मुख्यालयासह विटा, तासगाव, मिरज, महात्मा गांधी चौक आदी पोलीस ठाण्याची वार्षिक पडताळणी केल्यानंतर श्री. फुलारी यांनी माध्यम प्रतिनिधींशी आज संवाद साधला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यावेळी त्यांनी सांगितले, की सामान्य माणसामध्ये पोलीसांच्याबाबत आपुलकी निर्माण व्हावी, पोलीस हा जनतेचा रक्षक व सेवक आहे ही भावना निर्माण होणे गरजेचे आहे. तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात येणार्‍या प्रत्येकाला अगोदर पाणी हवे का अशी विचारणा करून त्याच्या तक्रारीची दखल घ्यावी, त्यानंतर त्यांच्यावर तात्काळ योग्य ती कारवाई करण्याच्या सूचना जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी यांना देण्यात आल्या आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Inspector general instructions to officials regarding police stations amy
First published on: 17-03-2023 at 21:05 IST