विधीमंडळामध्ये निलंबन कारवाई झाल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील इस्लामपूरमधील साखराळे येथे दाखल झाले आहेत. पाटील यांचे कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केले.पाटील यांना भेटण्यासाठी झुंबड उडाली. यावेळीपाटील यांनी कारखाना कार्यस्थळावर विविध गावातील नवनियुक्त सरपंच व सदस्य यांचे अभिनंदन करून त्यांना आप-आपल्या गावांची सेवा करण्यास शुभेच्छा दिल्या. हेही वाचा- आमदार जयकुमार गोरे यांच्या अपघातावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “मी स्वत: कधी…” नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत वाळवा तालुक्यातील ८१ पैकी ७१ गावात,तर मिरज पश्चिम भागातील ६ पैकी ५ गावात जयंत पाटील समर्थक राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सत्ता मिळविली आहे. पाटील हे निकालाच्या दरम्यान नागपुर येथील हिवाळी अधिवेशनात व्यस्त होते. त्यांचे शनिवारी दुपारी आगमन होताच हजारो कार्यकर्त्यांनी कारखाना कार्यस्थळावर धाव घेतली. हेही वाचा- पुणे : बाईक टॅक्सी विरोधात आंदोलन; अटक रिक्षाचालकांना दिलासा, रिक्षा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसह ३७ जणांना जामीन मंजूर यावेळी माजी सभापती आनंदराव पाटील, काँग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब पाटील,महाराष्ट्र केसरी आप्पासो कदम, छाया पाटील, प्रकाश पाटील, राहुल पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजयराव पाटील, माजी सभापती शुभांगी पाटील, महिला जिल्हाध्यक्षा सुस्मिता जाधव, तालुकाध्यक्षा सुनीता देशमाने,युवक तालुकाध्यक्ष संग्राम जाधव,कार्याध्यक्ष देवराज देशमुख यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी उपस्थित होते.