Mumbai Maharashtra Weather Update Live : लाडकी बहीण योजनेसाठी महायुती सरकारने सामाजिक न्याय विभाग व आदिवासी कल्याण विभागाचा निधी महिला व बालविकास विभागाकडे वळवल्याचा दावा केला जात आहे. यावरून आरोप प्रत्यारोप चालू आहेत. तर, मुळशीतील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणावरून राज्यातील वातावरण तापलं आहे. या प्रकरणाचे अपडेट्स आपण या लाईव्ह न्यूज ब्लॉगद्वारे घेणार आहोत. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी शशांक हगवणे, लता हगवणे व करिश्मा हगवणे या तिघांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
दरम्यान, वैष्णवीच्या पालकांची न्यायालयात बाजू मांडण्यासाठी वकील आर. आर. कावेडिया यांची नेमणूक करण्यात आली आहे. दुसऱ्या बाजूला सुशली हगवणे व शशांक हगवणे यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे शस्त्रपरवाने मिळवल्याचं प्रकरण समोर आलं असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला जाण्याची शक्यता आहे. या प्रकरणाविषयीचे प्रत्येक नवे अपडेट्स तुम्हाला या न्यूज ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील.
दरम्यान, गोकुळ दूध उत्पादक संघाच्या अध्यक्षनिवडीसाठी आज कोल्हापुरात महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीवरही आपलं लक्ष असेल. तर, लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांच्या अर्जांची पडताळणी करताना २,६५२ लाडक्या बहिणी सरकारी कर्मचारी असल्याचं निदर्शनास आलं आहे. त्यांचे अर्ज बाद केले जातील. तसेच आणखी सहा लाख महिलांच्या अर्जांची पडताळणी केली जाईल. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये होतील असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे. या निवडणुका आम्ही महायुती म्हणून लढू असंही बावनकुळे यांनी म्हटलं आहे.
Latest Maharashtra News Highlights : महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या एकाच क्लिकवर.
हिंगोलीतील काँग्रेसला गळती; माजी जिल्हाध्यक्ष देसाई भाजपमध्ये
पावसाने उसंत घेताच ‘केशर’ चे दर तेजीत
मोसमी वाऱ्यांची वाटचाल खोळंबली
बहिणीची वैष्णवी हगवणे होऊ देऊ नका; महिला आयोगाला विनवणी
ग्रामीण भागातील मुलांचा तंत्रनिकेतनमधील ‘यांत्रिक’ शाखेकडे ओढा
Vaishnavi Hagawane Case : वैष्णवी हगवणे प्रकारणात फरार निलेश चव्हाणला अटक, मुख्यमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले, "नेपाळमध्ये पळून…"
कांदिवलीत सोमवार, मंगळवारी पाणीपुरवठा बंद; जलवाहिनी जोडणी व झडप बसविण्याचे काम हाती
विकृती वाढली पण, महिला आयोगातील सदस्य संख्या तीच ; रुपाली चाकणकर यांची खंत
चिपळूणातील १५ गावे व ३६६ कुटुंबांना दरडी कोसळण्याच्या धोका; जिल्हा प्रशासनाची सर्वांना नोटीस
नागपुरातील सहकारी पत संस्थेत कोट्यावधींचा घोटाळा; सामान्यांच्या कष्टाचा पैसा पाण्यात
आमदार रवी राणांच्या निवासस्थानासमोर फासेपारधी आंदोलकांचा ठिय्या
Vaishnavi Hagawane Case: अखेर निलेश चव्हाणला नेपाळमधून अटक
पतीकडून पत्नीचा गळा दाबून खून; प्रकरण दडपण्यासाठी ह्रदयविकाराचा...
Vaishnavi Hagawane Case: निलेश चव्हाण थेट नेपाळला कसा गेला? गेले काही दिवस पोलिसांना कसा चकवा दिला?
"दोन्ही पवार एकत्र येण्यास अजित पवार गटातील दोन नेत्यांचा विरोध", राऊतांनी नावं आणि कारणही सांगितलं
दोन्ही पवार (शरद पवार व अजित) एकत्र येण्यास सुनील तटकरे व प्रफुल्ल पटेल यांचा विरोध आहे असा मोठा दावा शिवसेना (ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी केला आहे. दोन्ही नेत्यांना भाजपाच्या मोठ्या दुकानाबरोबर आपली छोटी तुकानं चालवायची आहेत, असंही राऊत म्हणाले.
संजय राऊत म्हणाले, "या दोन्ही नेत्यांना (प्रफुल्ल पटेल व सुनील तटकरे) भाजपाच्या मोट्या दुकानाबरोबर त्यांची छोटी दुकानं चालवायची आहेत. मोदी आणि शहांच्या मुख्य दुकानाबरोर आपलं छोटं दुकान चालवायचं आहे. राजकारणात जो तो आपला राजकीय फायदा पाहत असतो. प्रफुल्ल पटेल हे काही महान नेते नाहीत. तर तटकरेंना अध्यक्षपद टिकवायचं आहे. ते एका गटाचे अध्यक्ष आहेत. दुसरा गट विलीन झाला तर अध्यक्षपद जाण्याची त्यांना भीती आहे. अध्यक्षपद गेलं तर आपण काय करायचं असा त्यांना प्रश्न आहे. तसेच मंत्रिपदाचा प्रश्न देखील निर्माण होईल. राजकारण जो तो व्यक्ती आपापली व्यवस्था पाहत असतो. आपापला फायदा-तोटा पाहत असतो".
कांदा नुकसानीला एकरी एक लाखाची मदत गरजेची ; उत्पादक संघटनेचे मुख्यमंत्र्यांना साकडे
महिन्याभरानंतरही छळ करणारे पोलिसांना सापडेना; वंशांचा दिवा देऊ न शकल्याने मुलीची हत्या करत आईने केली होती आत्महत्या
'गोकुळ'च्या अध्यक्षपदी हसन मुश्रीपांचे चिरंजीव नाविद यांची निवड
कोल्हापूरमधील गोकुळ दूधसंघाच्या चेअरमनपदी वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव नाविद यांची निवड झाली आहे. अध्यक्षांची निवड करण्यासाठी सकाळी १० वाजल्यापासून कोल्हापुरात राजकीय खलबतं चालू होती. मंत्री हसन मुश्रीफ यांनी व महायुतीने जोरदार मोर्चेबांधणी केली होती. त्यास यश मिळालं असून नाविद मुश्रीफ यांची गोकुळच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे.
केळवा येथील रिसॉर्टमध्ये १७ वर्षीय मुलीवर गोळीबार;उपचारासाठी बोईसर येथे हलवले
"शरद पवारांचा पक्ष फुटायच्या मार्गावर", जयंत पाटलांचा उल्लेख करत शिंदे गटाचा मोठा दावा
सामाजिक न्याय मंत्री तथा शिवसेना (शिंदे) नेते संजय शिरसाठ म्हणाले, "राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचं त्या पक्षात मन लागत नाही. तसेच एक गट पक्षात त्यांच्याविरोधात सक्रीय आहे हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. त्यामुळे जयंत पाटील फार दिवस तिथे राहतील असं वाटत नाही.सर्वांनाच याबाबत शंका वाटतेय. शरद पवार गटात मोठी अस्थिरता आहे. त्या पक्षातील काही जण म्हणतात युती करायची, तर काहींचा युतीला विरोध आहे, तर काही जण पदांसाठी भांडत आहेत. त्या पक्षात सगळा गोंधळ माजलाय. पक्षात लवकर महत्त्वाचे निर्णय झाले नाहीतर तर शरद पवारांचा पक्ष फुटायच्या मार्गावर आहे".
अजित पवार गटात गुलाबराव देवकर वगळता नव्याने प्रवेश केलेले अजूनही रुळेनात… कार्यक्रमांपासून दूरच
गावठी पिस्तूल बाळगणारे दोघे संगमनेरमध्ये अटकेत; पोलीस कोठडीत रवानगी
राज्यात पहिल्यांदाच सायबर संशयित गुन्हेगारांना मोक्का ; डिजिटल अरेस्ट कत्रिकुट गजाआड
अर्नाळ्यात महावितरणच्या कर्मचाऱ्यांना विजेचा धक्का ;एकाचा मृत्यू , तीन जण जखमी
आज ठरणार 'गोकुळ'चा नवा अध्यक्ष? मुश्रीफांच्या उपस्थितीत कोल्हापुरात दोन तास खलबतं
कोल्हापूरमधील गोकुळ दूधसंघाच्या चेअरमनपदाची निवड आज होणार आहे. यासाठी कोल्हापुरात मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत गेल्या दोन तासांपासून खलबतं चालू आहेत. दुपारी तीन ते साडेतीन वाजण्याच्या सुमारास गोकुळच्या नव्या चेअरमनचं नाव जाहीर केलं जाऊ शकतं.
एकाच मालाला दोन दर; एपीएमसीतील दुहेरी भावनीतीने शेतकरी आणि ग्राहक मेटाकुटीला
मी कुठे चोऱ्या केल्या आहेत काय ? मंत्री गिरीश महाजन कोणावर बरसले ?
"शिंदे-फडणवीसांमध्ये विसंवाद, तर अजित पवार व शिंदेंमधून विस्तव जात नाही", राऊतांचा दावा
शिवसेना (ठाकरे) खासदार संजय राऊत म्हणाले, "मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात विसंवाद आहे, कम्युनिकेश गॅप आहे. तर शिंदे व अजित पवारांमधून विस्तव जात नाही, हे देखील सर्वांना माहिती आहे. अशा परिस्थितीत एकनाथ शिंदे हे स्वतंत्र बेटावर उभे आहेत. अजित पवार दुसऱ्या टोकाला आणि फडणवीस तिसऱ्या टोकाला उभे आहेत, तरी देखील ही महायुती आहे. मात्र, एकनाथ शिदे आमच्याकडे होते तेव्हा त्यांचा उद्धव ठाकरेंशी संवाद पक्का होता. आता ते कोमात का गेले आहेत त्याचा तपास फडणवीसांनी केला पाहिजे".
२६५२ सरकारी कर्मचाऱ्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ, सरकार सहा लाख अर्जांची पडताळणी करणार
लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांच्या अर्जांची पडताळणी करताना २,६५२ लाडक्या बहिणी सरकारी कर्मचारी असल्याचं निदर्शनास आलं आहे. त्यांचे अर्ज बाद केले जातील. तसेच आणखी सहा लाख महिलांच्या अर्जांची पडताळणी केली जाईल.