Mumbai Maharashtra Highlights: दुर्गराज रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५२ वा राज्याभिषेक दिन सोहळा साजरा होत आहे. यासाठी राज्य सरकारमधील विविध मंत्री उपस्थित आहेत. राज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून आज सकाळी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘छत्रपती शिवाजी महाराज भारत गौरव टुरिस्ट ट्रेन’ला हिरवा झेंडा दाखविण्यात आला.
दरम्यान, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दोन दिवसांपूर्वी ‘इंडियन एक्सप्रेस’ या वृत्तपत्रात लिहिलेल्या लेखामध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचा आरोप केला आहे. यावर केंद्रीय निवडणूक आयोगासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रत्युत्तर दिले आहे.
तसेच, सांगली लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणारे ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. राज्यातील या आणि इतर महत्त्वाच्या घडामोडींचा लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून सविस्तर आढावा घेऊया.
Maharashtra Breaking News Live Updates/ Shivrajyabhishek Din 2025 Live Updates : राज्यातील राजकीय, सामाजिक आणि इतर क्षेत्रातील घडामोडी लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊया.
"रेल्वेला पैसेही द्यायचे आणि रेल्वेने जीवही घ्यायचा", लोकल अपघातावर जितेंद्र आव्हाडांची संतप्त प्रतिक्रिया
मुंबईजवळ झालेल्या लोकल अपघातावर राष्ट्रवादीचे (शरद पवार) आमदार जितेंद्र आव्हाड यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये ते म्हणाले की, "धावत्या रेल्वेगाडीतून पडून झालेले मृत्यू हे वेदनादायक आहेत. लोकल ट्रेनमध्ये गर्दीच्या वेळेतील प्रवास हा नेहमीच जीवघेणा असतो. रेल्वेचा न सुधारण्याचा अट्टाहास हा अनेकांचा जीव घेऊन जातोय. प्रवाशांनी अनेकवेळा मागणी केली आहे की, दिवा टर्मिनेटिव लोकल ट्रेन सुरू करावी. गेल्या दशकात दिवा, मुंब्रा आणि कळवा परिसरातील लोकसंख्या हजार पटीने वाढली आहे. मुंबईला प्रवास करणाऱ्या प्रवाशांचीही संख्या हजार पटीने वाढली आहे. लोकल ट्रेनच्या फेऱ्या प्रवाशीसंख्येच्या तुलनेत वाढल्यात का? तर त्याचे उत्तर 'नाही' असेच आहे."
आव्हाड पुढे म्हणाले की, "भारतातील सर्वात जास्त महसूल हा मुंबई लोकलमधून मिळतो. रेल्वेला पैसेही द्यायचे आणि रेल्वेने जीवही घ्यायचा, हे ऐकायलाही योग्य वाटत नाही. रेल्वेने काहीतरी उपाययोजना कराव्यात, एवढीच सर्व प्रवाशांची मागणी आहे. दिवा टर्मिनेटींग लोकल ट्रेन हा त्यावरील एक छोटासा उपाय आहे."
Nashik Citylink bus service: नाशिक सिटीलिंक बससेवेचा ऑफलाईन पास काढताय ? नवीन प्रक्रिया माहित आहे का ?
Mumbai Local Accident Live Updates: “हे अपघाती नाही, सरकारने घेतलेले बळी”, लोकल अपघातानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची टीका
ठाणे येथे आज झालेल्या लोकल अपघातानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, "आज सकाळी मुंब्रा स्थानकाजवळ दोन लोकल गाड्या एकमेकांजवळून जाताना घासल्याने लटकलेले आठ प्रवासी रेल्वे ट्रॅकवर पडले. या घटनेत ५ प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे वृत्त अत्यंत दु:खद आहे. त्यांना माझी भावपूर्ण श्रध्दांजली!"
ते पुढे म्हणाले की, "गेल्या अकरा वर्षापासून महाराष्ट्राची आणि मुंबईची जनता पायाभूत सुविधा आणि मुंबईकरांचा प्रवास सुखकर हेणार या पोकळ गप्पा ऐकत आहे. सुविधा आणि विकासाच्या नावाखाली टेंडर द्या आणि कमिशन घ्या हा खेळ महाराष्ट्रात सुरु आहे. सत्ताधारी अधिकारी आणि ठेकेदार यातून गब्बर झाले आहेत. या भ्रष्टाचाराची किंमत मात्र सर्वसामान्यांना नागरिकांना आपला जीवाने चुकती करावी लागते आहे. सरकारने आता तरी जागे होऊन, इव्हेंटबाजी सोडून मुंबईकरांचे लोकल प्रवासात जीव जाऊ नयेत यासाठी तातडीने पावले उचलावीत."
Mumbai Local Accident: मुंब्रा येथे घडलेल्या अपघातामुळे डीआरएमवर कारवाईची मागणी; मुंबई रेल्वे प्रवासी संघ आक्रमक
Mumbra Train Accident : मुंब्रा स्थानकाजवळ अपघात कसा झाला? रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितलं नेमकं कारण
"गर्दी व प्रवाशांच्या सुरक्षेकडे अधिक गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज", लोकल अपघातानंतर अजित पवारांची प्रतिक्रिया
"मध्य रेल्वेमार्गावरील कोपर ते दिवा स्थानकादरम्यान कसाऱ्याहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या उपनगरीय रेल्वेगाडीतून पडून प्रवाशांचा झालेला मृत्यू दूर्दैवी आणि क्लेशदायक आहे. रेल्वे प्रवाशांच्या मृत्यूनं उपनगरीय रेल्वे मार्गावरील गर्दी व प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या मुद्याकडे अधिक गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज अधोरेखित झाली आहे", अशी पोस्ट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे.
या पोस्टमध्ये ते पुढे म्हणाले की, "उपनगरीय रेल्वेसेवा अधिक प्रभावी आणि सुरक्षित करण्यासाठी रेल्वे प्रशासन लवकरात लवकर ठोस पावलं उचलेल, असा विश्वास आहे. अपघातातील जखमी प्रवाशांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होवो, अशी प्रार्थना करतो. मृत्यू पावलेल्या प्रवाशांच्या कुटुंबियांच्या दु:खात सहभागी असून दिवंगत प्रवाशांना दु:खद अंत:करणानं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो."
https://twitter.com/AjitPawarSpeaks/status/1931959820426318163
ठाणे लोकल अपघाता प्रकरणी प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "मुंब्रा स्थानकाजवळ आज सकाळी झालेल्या भयंकर अपघातामुळे मी खूप व्यथित झालो आहे. रोज सकाळी हजारो प्रवासी या मार्गावरून ये जा करतात. ही अतिशय दुःखदायक घटना आहे. मी मृतांच्या परिवाराच्या दुःखात सहभागी आहे. जखमींवर तातडीने व्यवस्थित उपचार करण्याचे निर्देश ठाणे आणि कळवा येथील रुग्णालयांना दिले आहेत. मी स्वतः देखील डॉक्टरांशी बोललो आहे. रेल्वे मार्फत या दुर्घटनेची चौकशी सुरू करण्यात आली आहे ही अतिशय दुर्दैवी घटना असून नेमका अपघात कशामुळे झाला हे या चौकशीतून लगेच सामोरे येईल."
दिवा-मुंब्रा स्थानकादरम्यान झालेल्या लोकल अपघातातील मृतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धाजली वाहीली आहे. एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये ते म्हणाले की, "दिवा-मुंब्रा स्थानकादरम्यान लोकलमधून एकूण ८ प्रवासी खाली पडून झालेल्या दुर्घटनेत काही जणांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. जखमींना तातडीने शिवाजी हॉस्पिटल आणि ठाणे रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ही घटना नेमकी कशामुळे घडली, याची चौकशी रेल्वे विभागाने सुरू केली आहे."
Pushpak Express Accident : मोठी बातमी! दिवा स्थानकाजवळ पुष्पक एक्सप्रेसमधून पडून पाच प्रवाशांचा मृत्यू
Aaditya Thackeray : मनसेशी युतीबाबत उद्धव ठाकरेंनी कोणावर जबाबदारी दिलीये का? आदित्य ठाकरे म्हणाले, "महाराष्ट्राच्या हितासाठी…"
ठाण्यात एक भयानक रेल्वे अपघात घडला असून, धावत्या रेल्वेतून सुमारे दहा प्रवासी रुळावर पडले असून, यामध्ये पाच प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान पडलेल्या प्रवाशांपैकी काहीजण रेल्वेला लटकून प्रवास करत होती, अशी माहिती आहे. यातील जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मुंबई-गोवा महामार्गावर सावंतवाडीजवळ मळगाव येथे भीषण अपघात; गुजरातचे ५ पर्यटक जखमी
Live: "तरुणांना आपल्या इतिहासाबद्दल जाणून घ्यायचे आहे", छत्रपती शिवाजी महाराज भारत गौरव यात्रा ट्रेनला मुख्यमंत्र्यांकडून हिरवा झेंडा
छत्रपती शिवाजी महाराज भारत गौरव यात्रा ट्रेनबाबात बोलताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "शिवराज्य अभिषेक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा. ३५१ वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. आजपासून सुरू झालेली छत्रपती शिवाजी महाराज भारत गौरव यात्रा ट्रेन प्रवाशांना पुढील ५ दिवसांत शिवाजी महाराजांशी संबंधित सर्व प्रमुख ठिकाणी घेऊन जाईल. यासाठी मी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि पंतप्रधान मोदी यांचे आभार मानू इच्छितो. ही ट्रेन पहिल्या प्रवासात पूर्ण बुक झाली आहे. आज ७१० प्रवासी त्यातून प्रवास करत आहेत. विशेष म्हणजे यातील ८०% प्रवासी ४० वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत. याचा अर्थ तरुणांना आपल्या इतिहासाबद्दल जाणून घ्यायचे आहे."
Live: 'छत्रपती शिवाजी महाराज भारत गौरव पर्यटन ट्रेन'चा हिरवा झेंडा दाखवून थाटात शुभारंभ
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांचे वैभव साजरे करणाऱ्या 'छत्रपती शिवाजी महाराज भारत गौरव पर्यटन ट्रेन'चा हिरवा झेंडा दाखवून थाटात शुभारंभ करण्यात आला.
https://twitter.com/CMOMaharashtra/status/1931918400034591215
दुर्गराज रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५२ वा राज्याभिषेक दिन सोहळा साजरा होत आहे. यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राज्य सरकारमधील विविध मंत्री उपस्थित आहेत.
(Photo: Uday Samant/X)
महाराष्ट्र लाईव्ह न्यूज अपडेट्स ९ जून २०२५.