महाराष्ट्राच्या राजकारणात आठ महिन्यांपूर्वी मोठा भूकंप झाला. जून २०२३ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली होती. पक्षातील काही आमदारांना आपल्याबरोबर घेत अजित पवार यांनी वेगळा गट बनवला आणि या गटासह त्यांनी महायुतीत प्रवेश केला. तसेच मूळ पक्षावर आणि पक्षचिन्हावर दावा केला. त्यामुळे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने निवडणूक आयोगाचं दार ठोठावलं. निवडणूक आयोगाने याप्रकरणी मंगळवारी (६ फेब्रुवारी) निकाल दिला. या निकालानुसार अजित पवार गटच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचं निवडणूक आयोगाने म्हटलं आहे. यासह आयोगाने पक्षाचं चिन्हही अजित पवार गटाला बहाल केलं आहे. त्यामुळे शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे.

निवडणूक आयोगाच्या या निकालावर वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही यावर प्रतिक्रिया दिली आहे. मनसेने या निकालावर भाष्य करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लक्ष्य केलं आहे. मनसेने एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, बुजुर्ग काकांनी उभा केलेला पक्ष दुसऱ्याच्या बळावर हिसकावणं सोप्पं आहे. पण बुजुर्ग नेत्याचा अवमान न करता स्वतःच्या बळावर स्वतःचा पक्ष उभा करणं, चिन्ह मिळवणं यासाठी राज ठाकरे यांच्यासारखा संघर्ष आणि संयम लागतो, हिंमत लागते… असो, त्यांचं राजकारण त्यांना लखलाभ!

readers comments on Loksatta editorial
लोकमानस : सरकारला सर्वच आंदोलनांची भीती वाटते
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Supriya Sule
Supriya Sule : “दीड ते दोन महिन्यांत आपल्याच विचारांचं सरकार…”, सुप्रिया सुळेंचं महत्त्वाचं विधान
Amit Shah Nagpur, BJP, Congress, Vidarbha,
महाशक्तीला विदर्भात काँग्रेसची भीती का वाटते ?
Jayant Patil
Jayant Patil : “एका मोठ्या नेत्याने पक्षात येण्याची इच्छा व्यक्त केली”, जयंत पाटलांचं येवल्यात विधान; इच्छा व्यक्त करणारा नेता कोण? चर्चांना उधाण
Efforts by BJP and Shiv Sena Shinde group to make Ajit Pawar group leave the Grand Alliance and contest the assembly elections independently
अजित पवारांच्या एक्झिटसाठी चक्रव्यूह? भाजप-शिंदे गटाकडून आक्रमक रणनीती
Mahayuti, Shinde group leader,
महायुतीमध्ये मैत्रीपूर्ण लढतीची शक्यता, शिंदे गटाच्या नेत्याचे भाकित
Ajit Pawar, NCP, Vidarbha, Ajit Pawar and Vidarbha,
Ajit Pawar : अजित पवारांच्या राष्ट्रवादीत विदर्भात धुसफूस, ‘हे’ आहे कारण

यापाठोपाठ मनसेने आणखी एक पोस्ट एक्सवर केली आहे. यामध्ये मनसेने अजित पवार यांच्या जुन्या भाषणाचा काही भाग शेअर केला आहे. निवडणूक आयोगाने मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत जो निकाल दिला. असाच काहीसा निर्णय काही महिन्यांपूर्वी शिवसेनेबाबतही दिला होता. निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि पक्षाचं चिन्ह शिंदे गटाला दिलं आहे. या निकालावर अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली होती. अजित पवार तेव्हा विधानसभेचे विरोधी पक्षनेते होते.

अजित पवार आपल्या भाषणात म्हणाले होते, अरे ज्यांच्या वडिलांनी पक्ष काढला आणि तो वाढवला, मुंबईच्या शिवाजी पार्कवर या पक्षाची स्थापना केली आणि हा पक्ष महाराष्ट्राच्या सर्वदूर पोहोचवला. त्यांचाच पक्ष तुम्ही काढून घेतलात. त्यांचं चिन्ह काढून घेतलंत. निवडणूक आयोगाने जरी निर्णय दिला असला तरी हा निर्णय जनतेला पटलाय का, त्याचा विचार झाला पाहिजे. तुमच्यात धमक होती तर स्वतःचा काढा, तुम्हाला कोणी अडवलं होतं?

यासह मनसेने म्हटलं आहे की, ‘भुजां’मध्ये कितीही ‘बळ’ आहे असं म्हटलं तरी नीतिमत्तेचे ‘तट’ फोडून सत्तेसाठी घातलेला हा ‘वळसा’ महाराष्ट्राला ‘पटेल’ का? वाह रे पट्ठ्या!