कांद्याची आयात आणि राज्यभरात कांद्यांच्या घसरलेल्या भावावरून नाशिक येथे ९ सप्टेंबरपासून केंद्र सरकारविरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी रविवारी दिला. केंद्र सरकारने कांद्याच्या आयातीवर त्वरित बंदी घालावी, तसेच कांदा निर्यातीसाठी शेतकऱ्यांना अनुदान द्यावे, अशी मागणीदेखील राजू शेट्टी यांनी केली. स्वाभिमानी शेतकरी संघटना महाराष्ट्रातील महायुतीच्या घटकपक्षांचा भाग असल्यामुळे विधानसभेच्या तोंडावर महायुतीच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे. केंद्र सरकारने महाराष्ट्रातील शेतक-यांच्या प्रश्नांची योग्य ती दखल न घेतल्यास आगामी विधानसभा निवडणुकीत याचा फटका पडू शकतो असा इशाराही राजू शेट्टी यांनी दिला.
संग्रहित लेख, दिनांक 7th Sep 2014 रोजी प्रकाशित
राजू शेट्टी यांचा केंद्र सरकारविरोधात आंदोलनाचा इशारा
कांद्याची आयात आणि राज्यभरात कांद्यांच्या घसरलेल्या भावावरून नाशिक येथे ९ सप्टेंबरपासून केंद्र सरकारविरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी रविवारी दिला.
First published on: 07-09-2014 at 04:13 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raju shettis agitation against central government