Ramdas Kadam : बाळासाहेब ठाकरेंच्या शेवटच्या दोन दिवसांत कुणीही त्यांच्या खोलीत गेलं नव्हतं. अनिल परब म्हणाला आहे की शेवटच्या दिवसांमध्ये असंख्य लोक भेटले हे तो धादांत खोटं बोलला आहे. अनिल परबला माझं सांगणं आहे की जनाची नाही मनाची तरी लाज ठेव. असं रामदास कदम यांनी म्हटलं आहे. तसंच रामदास कदम यांनी अनिल परब यांच्यावरही आरोप केले आहेत.

अनिल परबची औकाद आहे का?

अनिल परब हा नीच माणूस आहे, तो पैसे खाण्यासाठी बिल्डरांचे पाय चाटतो. माझ्याकडे एक प्रतिज्ञापत्र आलं आहे त्यात त्या माणसाने म्हटलं आहे की आमच्या सहाना गुप्रचे मालक सुधाकर शेट्टी यांनी अनिल परबला दोन मर्सिडिज दिल्या आहेत. कोट्यवधी रुपये अनिल परबने बिल्डर्सकडून कमवले आहेत. बिल्डरकडून दोन मर्सिडिज घेतल्या आहेत. या माणसाने माझ्यावर बोलावं? याची औकाद आहे का? उद्धव ठाकरेंना म्हणजेच त्याच्या मालकाला खुश करण्यासाठी तो सगळं बोलत होता. असं रामदास कदम म्हणाले.

बाळासाहेब ठाकरेंबाबत अनिल परब दलाली खाऊन खोटं बोलला-रामदास कदम

बाळासाहेब ठाकरेंबरोबर डॉक्टरांची टीम होती. त्यानंतर आम्ही सगळे जनतेसमोर गेलो. हे सगळं धादांत खोटं आहे. मी दाव्याने सांगतो. शेवटच्या दोन दिवसांत बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत कुणालाही जाऊ दिलं जात नव्हतं. अनिल जे बोलला ते दलाली खाऊन खोटं बोलला आहे. त्याने महाराष्ट्राच्या जनतेची फसवणूक केली आहे. सगळे नेते आणि डॉक्टर लोकांपुढे गेले होते असं सांगितलं त्याने मनाची तरी लाज बाळगावी. मी लोकांसमोर, शिवसैनिकांसमोर गेलो. बाळासाहेब गेल्याचं मी जाहीर केलं आहे इतर कुणीही नव्हतं. डॉक्टरांची टीम होती असं अनिल सांगतोय त्याने टीमच्या लोकांची नावं सांगावीत. जर टीम होती तर मेडिकल बुलेटिन का काढलं नाही? ते कोण तुझा बाप देणार होता का? असाही प्रश्न रामदास कदम यांनी विचारला आहे. दोन दिवस डॉक्टर नव्हते. कुणालाही जाऊ दिलं जात नव्हतं, त्यामुळे मी संशय व्यक्त केला. त्यात चूक काय? उद्धव ठाकरेचे बाप होते बाळासाहेब ठाकरे. ते का गप्प का बसले आहेत? ते उत्तर का देत नाहीत? असा प्रश्न रामदास कदम यांनी विचारला.

रामदास कदम आणखी काय म्हणाले?

अनिल परब सारखी नालायक माणसं शिवसेनेला डाग लावतात. आमदरकी काढून घेऊन तुझी हकालपट्टी झाली पाहिजे. उद्धव ठाकरेंना मी एकदा म्हणालो होतो की तुम्ही बाळासाहेबांच्या पायांचे ठसे घेऊन ठेवा. कारण ते आम्हाला पूजनीय आहेत. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी सांगितलं की त्यांनी बाळासाहेबांच्या हातांचे ठसे घेतले आहेत. मला हे त्यांनीच सांगितलं, त्यावेळी हा अनिल परब तिकडे नव्हताच. नार्को टेस्ट करायची असेल तर अनिल परबची करा म्हणजे किती कोटी रुपये खाल्ले, कुणाकडून गाड्या घेतल्या ते सगळं बाहेर येईल असंही रामदास कदम म्हणाले.