सातारा : सहस्त्र पाऊले। दौडतसे वारी। करण्या पंढरी। नजदिक ॥ सोहळा आनंदी। आषाढ मास । घेतला ध्यास । विठु दर्शना ॥, हा अभंग मुखात घेऊन नाम संतांचे पण मनासी आस विठ्ठल भेटीची घेऊन ।। पंढरीशी जाऊ शांत समरूप विठ्ठल पाहू ।। या ओढीने निघालेला वैष्णवांचा मेळा फलटणनगरीतील आपला मुक्कामाहून पुढे माउलींच्या पालखीने आज सकाळी पंढरपूरच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकले. ‘हरिनामाचा गजर’ करत पालखी रविवारी सायंकाळी सातारा जिल्ह्याच्या सीमेवरच्या बरड (ता. फलटण) गावी विसावली. आज सकाळची आरती आणि निघण्याचा भोंगा झाल्यावर पालखी बरडकडे मार्गस्थ झाली.

सकाळी विडणी येथे चहापान झाले. तेथील नीरा नदीच्या रामरामोशी पुलावर माउलींच्या स्वागतासाठी मोठी गर्दी झाली होती. नुकत्याच झालेल्या पावसाने नदीला पाण्याचा विसर्ग सोडल्याने नीरा नदीचे पात्र भरून वाहत आहे. पालखी सोहळ्याने नीरा नदीला प्रदक्षिणा घालत बरडकडे प्रस्थान ठेवले. पालखी दुपारी दोनच्या दरम्यान पिंपरद येथे दुपारच्या विसाव्यासाठी व न्याहरीसाठी थांबली. या वेळी चोहोबाजूंनी माउलींचा गजर सुरू होता.

रात्रीच्या मुक्कामासाठी सहा साडेसहाच्या दरम्यान माउलीची पालखी बरड (ता. फलटण) येथे दाखल झाली. बरड येथे आज मुक्काम आहे. पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांच्या वाढत्या संख्येमुळे पालखी तळ अपुरे पडत आहेत. उद्या सोमवारी पालखी सोलापूर जिल्ह्यात शेवटच्या टप्प्यात प्रवेश करणार आहे.

आळंदीपासून न थकता मैलोमैल प्रवास करून वारकरी पंढरपुराचा अखेरचा टप्पा जवळ आल्याने खुशीत आहेत. त्यांना पंढरीची आणि विठू माऊलीच्या दर्शनाची ओढ लागली आहे.

आज रविवार (दि. २९ जून) संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखीचा सोहळ्याचा फलटण तालुक्यातील बरड येथे मुक्काम असून, वारकरी मोठ्या संख्येने येथे दर्शनासाठी आले आहेत. मागील दोन दिवसांत तरडगाव ते फलटण आणि फलटण ते बरड असा मोठा पल्ला पार पाडत पालखी फलटणहून बरड येथे पोहोचली. मात्र, वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर थकव्याचा कोणताही लवलेशही नव्हता. पालखी पोहोचल्यानंतर ती मुक्कामाच्या ठिकाणी पोहचली तेव्हा ग्रामस्थांनी उत्साहात पालखी सोहळ्याचे स्वागत केले. सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करण्यापूर्वी धर्मपुरी येथे सोमवारी चहापानासाठी थांबणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उद्या सोमवारी पालखी सोलापूर जिल्ह्यात शेवटच्या टप्प्यात प्रवेश करणार आहे. सातारा जिल्हा प्रशासनाच्या वतीने साताऱ्याच्या सीमेवर संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याची सूत्रे सोलापूरच्या प्रशासनाकडे सुपुर्द केली जाणार आहेत.