महाराष्ट्रात राज्यसभेची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ विधानसभा विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला पोहोचलं होतं. या पार्श्वभूमीवर शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांचं कौतुक केलं आहे. देवेंद्र फडणवीस परिपक्व नेते असल्याचं संजय राऊत यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.

महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यासंबंधी बोलताना ते म्हणाले की, “हे एक अत्यंत चांगलं पाऊल आहे. देवेंद्र फडणवीस परिपक्व नेते आहेत. महाराष्ट्राचं राजकीय वातावरण प्रदूषित, गढूळ झालं असताना राज्यसभा निवडणुकीच्या निमित्ताने हे वातावरण अजून बिघडण्याची शक्यता वाटत आहे. घोडेबाजार महाराष्ट्रात अत्यंत वाईट पद्धतीने सुरु आहे”.

राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होणार? महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळानं घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट!

“आमचा राष्ट्रीय पक्ष आहे त्यामुळे…”; राज्यसभा निवडणूक बिनविरोध करण्याबाबत भाजपाने स्पष्ट केली भूमिका

“निवडणुका जिंकण्यासाठी जो पैसा आणला जात आहे त्याचा ईडीने तपास करायला व्हा. आमदारांना विकत घेण्यासाठी प्रलोभनं दाखवणारे कोण आहेत? कोटींच्या आकड्याागचे सूत्रधार कोण आहेत? याचा विचार जनतेने करणं गरजेचं आहे. सर्व पक्ष शिष्टमंडळ महाराष्ट्राच्या हितासाठी विरोधी पक्षनेत्यांना भेटत असेल आणि त्यातून काही चांगला मार्ग निघणार असेल तर त्याचं स्वागत केलं पाहिजे,” असंही संजय राऊत म्हणाले आहेत.

भेटीत नेमकं काय झालं?

देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी शिष्टमंडळासोबत गेलेले राज्याचे अन्न पुरवठा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. “राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी उरलेल्या मतांची संख्या महाविकास आघाडीकडे जास्त आहे. त्यामुळे आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही आम्हाला ही संधी द्या. आमचा एक उमेदवार राज्यसभेवर बिनविरोध जाऊ द्या. तुम्ही माघार घ्या. पुढच्या वेळी या जागेची भरपाई विधानपरिषदेच्या वेळी करु”, असं छगन भुजबळ म्हणाले.

Maharashtra News Live : दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी, क्षणोक्षणीचे अपडेट्स जाणून घ्या एकाच क्लिकवर

“चर्चा चांगली झाली. हसत खेळत झाली. ३ वाजेपर्यंत माघार घ्यायची आहे. त्यांच्याकडून ऑफर अशी होती की ही राज्यसभेची जागा तुम्ही आम्हाला सोडा आणि आम्ही तुम्हाला विधान परिषदेची जागा जास्तीची देतो. आम्हीही आमच्या नेत्यांशी चर्चा करू. मग ते दिल्लीला कळवून त्याबाबत चर्चा करतील. कुणीतरी एकाने माघार घ्यावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्याला यश मिळेल असं आम्हाला वाटतंय”, असं भुजबळांनी यावेळी नमूद केलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भाजपाला प्रस्ताव अमान्य

भाजपा तीन जागा लढण्यावर ठाम असल्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले आहे. “महाविकास आघाडीच्या नेत्यांचा काल देवेंद्र फडणवीस यांना फोन आला होता. त्यानुसार छगन भुजबळ, अनिल देसाई आणि सुनिल केदार हे भेटण्यासाठी आले होते. राज्यसभेच्या निवडणुकीसाठी आज ३ वाजेपर्यंत माघार घेण्याचा वेळ आहे. गेल्या २० वर्षापासून राज्यसभेच्या, विधानसभेच्या निवडणुका बिनविरोध घेण्याची परंपरा आहे. पण निवडणूक तथ्यांच्या आधारे बिनविरोध होते. त्यामुळे आमचा आग्रह आहे की भाजपाला राज्यसभेच्या तिन्ही जागा मिळाव्यात आणि विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या बाबतीत काही विचार करता येईल. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी खूप चर्चा झाल्यानंतर तोच प्रस्ताव वारंवार मांडला,” असे चंद्रकांत पाटील म्हणाले.