शिवसेना आणि काँग्रेस फोडल्यामुळे भाजपाचं वस्त्रहरण झालं आहे. देवेंद्र फडणवीस यांची भाषणं काढून बघा. नवाब मलिक यांच्या कोठडीच्या बाजूला कोण जाणार? अजित पवार चक्की पिसिंग.. हे सगळं त्यांच्याच भाषणांमध्ये आहे. भविष्यात तुरुंगात जायची वेळ येऊ शकते. भ्रष्टाचाराचं खुलं समर्थन दुसरं कुणीही दिलेलं नाही. नरेंद्र मोदी चोवीस तासांपूर्वी काय बोलतात? आणि त्यानंतर महाराष्ट्रात काय घडलं हे जगातल्या ३३ देशांनी पाहिलं आहे असं म्हणत संजय राऊत यांनी बोचरी टीका केली आहे.

महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस वगैरे काहीही नाही

ऑपरेशन लोटस वगैरे काही नाही. त्यांचंच ऑपरेशन झालं आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी या पक्षांमध्ये भाजपाने अशा प्रकारे फूट पाडल्यामुळे महाराष्ट्रातच नाही तर देशाच भाजपाच्या इज्जतीचं आणि प्रतिष्ठेचं वस्त्रहरण झालं आहे, त्यांची वैचारिक सुंता झालेली आहे हे स्पष्ट दिसतं आहे. कालपर्यंत तुम्ही ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत होतात आज ते तुमच्या बरोबर आहेत. मुलुंडचे पोपटलाल काय काय बोलले आठवा. असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

ज्या लोकांना फोडलं आहे त्यांना घेऊन निवडणूक जिंकता येत नाही याची खात्री पटत नाही तोपर्यंत हे निवडणुका लावणार नाहीत. पण मी देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या गटांना सांगू इच्छितो की तुम्ही कितीही लोक फोडा. मुंबई महापालिकेवर आणि ठाणे महापालिकेवर शिवसेनेचा भगवाच फडकणार असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तसंच आत्ता निवडणुका घ्या. अंदाज कसले व्यक्त करता आहात? ज्योतिषाचं पंचाग घेऊन बसला आहात का? उद्या निवडणुका घ्या आमची तयारी आहे असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भाजपा म्हणजे सीरियल किलर आणि रेपिस्ट

राष्ट्रवादी फुटली, पण त्याचवेळी त्यांनी प्रमुख लोकांना हाताशी धरून आम्हीच राष्ट्रवादी आहोत हा दावा करायला लावला. एखादा सीरियल किलर असतो त्याची मोडस ऑपरेंडी असते. सीरियल रेपिस्ट असतात. तसे भाजपा म्हणजे राजकारणातले सीरियल रेपिस्ट आणि सीरियल किलर आहेत. पक्ष एका विशिष्ट आकड्यांमध्ये फोडायचा आणि फुटलेल्या गटाला पक्षावर आणि चिन्हावर दावा करायला लावायचा हे यांचं धोरण आहे. महाराष्ट्रातून बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना हे नष्ट करायचं. त्यानंतर शरद पवारांचं नाव नष्ट करायचं. स्वतः काहीच करायचं नाही. जे स्वतः काही करत नाहीत ते अशा गोष्टी करतात असाही आरोप संजय राऊत यांनी केला.