झी मराठीवरील लोकप्रिय ठरत असलेली मालिका बाजी सध्या एका वेगळ्या वळणावर येऊन ठेपली आहे. या मालिकेत दाखविण्यात येणारा प्रत्येक प्रसंग प्रेक्षकांच्या पसंतीत उतरत असून आता या मालिकेमध्ये आणखी एक ट्विस्ट येणार असल्याचं पाहायला मिळत आहे.

‘बाजी’ या मालिकेतला बहुरूपी खलनायक शेरा हा त्याचं दुसरं रूप घेऊन पुण्यात परत शिरला आहे. तो आता कुबेरासारख्या श्रीमंत हिरे व्यापाऱ्याचं सोंग घेऊन परत आला असून मराठी साम्राज्याला पुन्हा एकदा त्याच्या विषारी नजरेला सामोरं जावं लागणार आहे.

Sourav Ganguly Reacts After Sunil Gavaskar Called Dhruv Jurel The Second Rising MS Dhoni
Sourav Ganguly : ‘माही’भाईशी जुरेलची तुलना होताच ‘दादा’ची रोखठोक प्रतिक्रिया; म्हणाला, “धोनीला धोनी बनण्यासाठी…”
future players in indian cricket team
विश्लेषण : टीम इंडिया ‘जनरेशन नेक्स्ट’ कशी असेल?
Kangana Ranaut
चित्रपटसृष्टीने आपल्याला अनेकदा अपमानित केले, कंगना राणावतचा न्यायालयात दावा
Taapsee Pannu reacts on wedding with Mathias Boe
तापसी पन्नू विदेशी बॉयफ्रेंडशी मार्चमध्ये लग्न करणार? अभिनेत्रीने चर्चांवर सोडलं मौन, म्हणाली, “मी कधीही…”

पेशवाई कालखंडाच्या पार्श्वभूमीवर या मालिकेतला खलनायक सध्या चर्चेत आहे. म्हातारा बनून वेगवेगळी कट कारस्थानं रचून पेशवाईत हैदोस घालण्याच्या इराद्यानं शिरला होता. पुण्याच्या कोतवालीतला प्रामाणिक शिलेदार बाजी यानं त्याला मारलं. पण तो खरच मेला आहे की जिवंत आहे,हे एक रहस्य आहे. त्याचा मृत्य झाला नसेल तर नेमकं त्याने काय घडवून आणलं हा ही एक उत्सुकतेचा विषय आहे. ऐतिहासिक घटनांचे संदर्भ घेत लिहिली गेलेली बाजी ही एक रहस्य कथा आहे,निजामाच्या कारस्थानाचा भाग म्हणून शेरा पेशवाई खळखिळी करण्यासाठी शेरा पुण्यात आला आहे.

तो केव्हा काय करेल याचा अंदाज बांधता येत नाही,अभिनेते प्रखर सिंग यांनी ही भूमिका साकरली असून त्याच्या अभिनय शैलीची आणि संवादाची खूप प्रशंसा होत आहे.या पात्राच्या तोंडी असलेल्या “हिंदुस्थान की राजनीती का दिमाग है शनिवारवाडा और हिंदुस्थान की खूबसुरती का दिल

बावनखनी” अशा संवादांनी हे पात्र अधिक रंगतदार झालंआहे. या मालिकेची निर्मिती आणि दिग्दर्शन संतोष कोल्हे यांनी केलं असून झी मराठीवर ही मलिका सोमवार ते शनिवार रोज रात्री साडेदहा वाजता प्रसारित होते.