छोट्या पडद्यावरील अल्पावधीत लोकप्रिय झालेली मालिका ‘तुला पाहते रे’ लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. सुबोध भावे आणि गायत्री दातार यांची मुख्य भूमिका असलेल्या या मालिकेनं प्रेक्षकांची मनं जिंकली. मालिकेत नुकतीच राजनंदिनी या भूमिकेची एण्ट्री झाली. त्यानंतर कथेत कोणतं रंगतदार वळण येणार याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये होती. मात्र आता ही मालिका लवकरच संपणार असल्याची माहिती खुद्द सुबोध भावेनं दिली आहे.

‘येत्या जुलै महिन्यापर्यंत ही मालिका संपणार आहे. मालिकाची कथा एवढीत होती. त्यात उगाच ओढून ताणून खतपाणी घालून कथा वाढवणार नाही हे आधीच ठरलं होतं. त्यामुळे काही रंगतदार वळणांनंतर जुलैपर्यंत ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेईल’ अशी माहिती सुबोधनं ‘लोकसत्ता ऑनलाइन’शी बोलताना दिली.

documentary on mangroves of maharashtra
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : पावलोपावली नवशिक्षण
Security guards have fake police character verification certificates
पिंपरी : धक्कादायक! सुरक्षारक्षकांकडे बनावट पोलीस चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्रे
lokmanas
लोकमानस: दांभिक नवनैतिकवाद्यांकडून अपेक्षा निरर्थक
lokmanas
लोकमानस: भाजपची हूल आणि गडी बाद

मालिकेत सुबोधने साकारलेली विक्रांत सरंजामेची भूमिका आणि गायत्रीने साकारलेली इशा निमकरची भूमिका प्रेक्षकांना कायम लक्षात राहील. वय विसरायला लावणाऱ्या विक्रांत-इशाच्या प्रेमकहाणीने तरुणाईलाही वेड लावलं. गायत्रीने या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं आणि पदार्पणातील तिच्या या भूमिकेने खूप लोकप्रियता मिळवली. आता मालिकेचा शेवट कसा करण्यात येईल हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.