बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा ‘अंतिम: द फाइनल ट्रुथ’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटाची प्रतिक्षा त्याचे चाहते गेल्या वर्षभरापासून करत होते. हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. या चित्रपटात बहिण अर्पिताचा पती म्हणजेच सलमानचा मेहूणाही मुख्य भूमिकेत आहे. दरम्यान, सलमानच्या चित्रपटासोबत त्याच्या चाहत्यांना तो लग्न कधी करणार असा प्रश्न आहे. नुकताच दिलेल्या एका मुलाखतीत आयुषने सलमान कधी लग्न करणार आणि तो लग्न का करत नाही आहे सांगितले आहे.

आयुषने नुकतीच आरजे सिद्धार्थ कननला मुलाखत दिली त्यावेळी त्याने हा खुलासा केला. यावेळी आयुषला सलमानच्या लग्नाविषयी विचारलं तर तो म्हणाला की “मी भाईला त्याच्या लग्नाविषयी कधीच काही विचारत नाही. कारण ज्या प्रकारे तो काम करतात त्याला बघून वाटतं नाही की त्याच्याकडे लग्नासाठी वेळ आहे. सलमानकडे बघून मला वाटतं की तो आता आनंदी आहे आणि त्याला जसे आयुष्य जगायचे आहे तो जगत आहे.”

आणखी वाचा : आमिरसोबत लग्नाच्या चर्चांवर अखेर फातिमाने सोडलं मौन म्हणाली…

आणखी वाचा : शत्रुघ्न सिन्हांची मुलगी होणार सलीम खान यांची सून? सोनाक्षीने केला तिच्या पहिल्या प्रेमाचा खुलासा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढे आयुष म्हणाला, “सलमान एकदम साधारण आयुष्य जगतो. त्याला फोनचा छंद नाही किंवा गाड्यांचा. एवढचं काय तर कपड्यांच्या बाबतीत पण त्याला असं नाही की मला असेच कपडे पाहिजे. मला वाटतं त्याला चित्रपटाची आवड आहे. कारण त्याला दोन-तीन तास एकटं ठेवलं तर ते चित्रपट पाहू लागतो.”