लग्न हे जितके पवित्र बंधन मानले जाते तितकेच हे नाते टिकवण्यासाठीही तेवढीच समज आणि विश्वास आवश्यक असतो. आजच्या काळात तरुणाईचा लग्नावरील विश्वास वेगाने कमी होत चालला आहे, अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांचे नाते अशा लोकांसाठी एक उदाहरण आहे. त्यांच्या लग्नाला ५२ वर्षे झाली आहेत. ३ जून १९७३ रोजी अमिताभ आणि जया यांचे एकमेकांशी लग्न झाले. या प्रवासात दोघांनीही अनेक चढ-उतार पाहिले असतील, परंतु त्यांनी कधीही एकमेकांना सोडले नाही.

आज अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांचा ५२ वा लग्नाचा वाढदिवस आहे. यानिमित्त चाहते अमिताभ आणि जया यांचे अभिनंदन करत आहेत. अमिताभ यांनी त्यांना शुभेच्छा देणाऱ्या चाहत्यांचे आणि फॉलोअर्सचे आभार मानले आणि सोशल मीडियावर एक सुंदर पोस्ट केली.

अमिताभ बच्चन यांनी काही लोकांची माफीही मागितली. त्यांनी लिहिले की, “जया आणि मला आमच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणाऱ्या सर्वांचे मी आभार आणि प्रेम व्यक्त करतो! मी सर्वांना वैयक्तिकरित्या उत्तर देऊ शकणार नाही, माफ करा.” या पोस्टवर चाहते अमिताभ यांचे अभिनंदन करत आहेत.

अनेक युजर्सनी अमिताभ आणि जया बच्चन वर्षानुवर्षे एकत्र राहावेत यासाठी प्रार्थनाही केली. एका वापरकर्त्याने लिहिले, “अभिनंदन सर! तुमच्या आणि जयाजींमधील प्रेमाचा ‘सिलसीला’ आयुष्यभर असाच चालू राहो.” दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले, “मनापासून शुभेच्छा आणि अभिनंदन. तुम्ही हे नाते अतिशय सन्मानाने पार पाडले आहे.” एका चाहत्याने लिहिले, “सर, तुमच्या ५२ व्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त तुम्हाला आणि जया मॅडमला खूप खूप शुभेच्छा! तुमची जोडी नेहमीच आम्हाला प्रेरणा देते – तुम्ही गेल्या काही वर्षांत प्रेम, आदर आणि एकतेचे जे उदाहरण ठेवले आहे ते सर्वांसाठी एक धडा आहे. तुम्ही दोघेही नेहमीच निरोगी आणि आनंदी राहावे अशी आमची इच्छा आहे.”

Jaya Bachchan and Amitabh Bachchan
अमिताभ-जया बच्चन (फोटो : एक्स पोस्ट)

डीएनएशी बोलताना जया एकदा म्हणाल्या होत्या की, “मी त्यांना ‘गुड्डी’ चित्रपटाच्या सेटवर भेटले होते. मी त्यांच्यापासून खूप प्रभावित झाले होते. मला वाटले की ते खूप वेगळे आहेत. जेव्हा मी हे इतरांबरोबर शेअर केले तेव्हा त्यांनी माझी खिल्ली उडवली. मी म्हणाले की ते एक दिवस नक्कीच काहीतरी करणार, मी काही वेळातच त्यांच्या प्रेमात पडले.”

यानंतर जया यांनी अमिताभ यांच्याबरोबर ‘जंजीर’ चित्रपटात काम केले. येथूनच त्यांचे नाते फुलू लागले. नंतर या मैत्रीचे प्रेमात रूपांतर होण्याची वेळ आली होती, जे लवकरच घडले. मग दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.