Gupt Movie Kajol Killer Role : १९९७ मध्ये आलेला ‘गुप्त’ हा चित्रपट अनेकांना आवडला. राजीव राय दिग्दर्शित या चित्रपटात काजोल, बॉबी देओल आणि मनीषा कोइराला यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या.

या थ्रिलर-अ‍ॅक्शन चित्रपटाच्या कथेचे सर्वांनी कौतुक केले आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड हिट ठरला. त्यावेळी ज्यांनी हा चित्रपट पाहिला त्यांना कल्पनाही नव्हती की काजोल त्यात खुनी बनून खलनायिकेची भूमिका साकारेल.

या चित्रपटासाठी कलाकारांना अनेक पुरस्कार मिळाले. सर्वात मोठ्या नकारात्मक भूमिकेत प्रमुख नायिका काजोलला पाहणे प्रेक्षकांसाठी अनोखे आणि उत्तम होते. चित्रपटात मनीषा कोइराला दुसऱ्या मुख्य भूमिकेत दिसली होती. चित्रपटाची कथा अद्भुत होती. पण, तुम्हाला माहिती आहे का की या चित्रपटात काजोलला किलर म्हणून दाखवल्याबद्दल दिग्दर्शक राजीव राय यांना अमिताभ बच्चन ओरडले होते.

अलीकडेच, रवी बुलेई ऑफिशियल या यूट्यूब चॅनेलशी बोलताना राजीव राय यांनी ही रंजक गोष्ट उघड केली. त्यांनी सांगितले की, चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी चेन्नईमध्ये एक ट्रायल शो आयोजित करण्यात आला होता, जिथे अमिताभ बच्चन यांनी ‘गुप्त’ पाहिला. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी राजीवला फोन केला आणि म्हणाले, “राजीव, तू जे केले आहेस त्याची तुला खात्री आहे का? तू काजोलला खुनी बनवलेस, तुला खात्री आहे की हे काम करेल?” राजीव हसत म्हणाला, “ते मला ओरडले होते. ते वरिष्ठ आहेत, ते ओरडू शकतात.” राजीवने त्यांना उत्तर दिले, “सर, मला तुमच्या प्रश्नांची उत्तरे माहीत नाहीत. फक्त दोन दिवस वाट पाहा. जनता शुक्रवारी उत्तर देईल” आणि जनतेने जोरदार उत्तर दिले. ‘गुप्त’ हा चित्रपट सुपरहिट झाला आणि आजही तो काजोलच्या कारकिर्दीतील सर्वात संस्मरणीय कामगिरी मानला जातो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राजीव पुढे म्हणाले की, त्यांनी ९० च्या दशकाच्या सुरुवातीला अमिताभ बच्चन यांच्यासाठी एक उत्तम पटकथा तयार केली होती. त्यांनी दिग्दर्शक अनीस बज्मी यांच्याबरोबर ती लिहिली आणि स्वतः अमिताभ यांना भेटून त्यांना ती कथा सांगितली. पण, त्यावेळी अमिताभ यांचे करिअर कठीण काळातून जात होते. राजीव म्हणाले, “त्यांनी सांगितले की, “मी सध्या ज्या काळातून जात आहे, त्या काळात मला कोणताही चित्रपट करायचा नाही.” या उत्तराने राजीव खूप दुखावले. “मी खूप मेहनत केली होती, मला खूप वाईट वाटले, पण मी अमितजींना नाही तर नशिबाला दोष दिला.”