देशभर ज्ञानवापी प्रकरणाची चर्चा सुरू आहे. सध्याची ज्ञानवापी मशीद भगवान शंकराचं मंदिर पाडून त्याच जागेवर बांधली असल्याचा दावा हिंदू संघटनांनी केला आहे. ज्ञानवापी मशीद आहे की मंदिर? हे प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात आहे. पुरातत्व विभाग सध्या याप्रकरणी माहिती गोळा करण्याचं काम करत आहे. सर्वोच्च न्यायालयाने पुरातत्व विभागाला मशीद आणि आसपासच्या परिसराचं सर्वेक्षण करण्याची परवानगी दिली आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर यावर वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. त्यापाठोपाठ बॉलिवूडमधूनही प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. बॉलिवूड अभिनेता आणि चित्रपट समीक्षक कमाल आर. खान सातत्याने यावर भाष्य करत आहे. कमाल खानने दोन दिवसांपूर्वी म्हटलं होतं की, ज्ञानवापी मशिदीचं मंदिरात रुपांतर करायचं, असा निर्धार सरकारने केला असेल तर सरकारला कोणीही रोखू शकत नाही. त्यामुळे मला वाटत की आता मुस्लीम समाजाने स्वतःहून मशीद सरकारच्या ताब्यात द्यावी!

कमाल खानने यावर आज पुन्हा एकदा भाष्य केलं आहे. त्याने याबाबत सलग दोन ट्वीट्स केले. पहिल्या ट्वीटमध्ये त्याने म्हटलं आहे की, अंदाज क्रमांक ९६ (कमाल खान सोशल मीडियावर वेगवेगळे अंदाज वर्तवतो, त्याचा लेखाजोखाही तो ठेवतो) : लवकरच न्यायालय घोषणा करेल की ज्ञानवापी मशीद हे मंदिरच होतं, आणि मग त्या जागेवर मंदिर बांधण्यासाठी मशीद पाडली जाईल.

हे ही वाचा >> अंजूने घटस्फोट न घेताच केला नसरुल्लाहशी निकाह, पहिला पती अरविंदने दाखल केला FIR

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कमाल खानने यावर आणखी एक ट्वीट केलं आहे. त्यात त्याने म्हटलं आहे, मी राम मंदिर बांधण्यासाठी ५०० रुपये देणगी दिली होती. आता ज्ञानवापी येथे हिंदूंचं मंदिर बांधण्यासाठी ५०० रुपये देणगी देईन. जय श्री राम!