सध्या 'हेरा फेरी' चित्रपटाच्या तिसऱ्या भागाची जोरदार चर्चा सुरु आहे. 'हेरा फेरा ३' चित्रपटावर निर्माते व दिग्दर्शक काम करत आहेत. पण या चित्रपटाच्या तिसऱ्या भागामध्ये अक्षय कुमार काम करताना दिसणार का? असा त्याच्या चाहत्यांना प्रश्न होता. पण अक्षय नव्हे तर कार्तिक आर्यन या चित्रपटामध्ये मुख्य भूमिका साकारणार असल्याचं जगजाहिर आहे. अक्षय या चित्रपटामध्ये काम न करण्यामागचं कारण आता समोर आलं आहे. आणखी वाचा - Video : “मैं तुम्हारा यहाँ इंतजार कर रहा हूँ” किरण मानेंची ‘बिग बॉस’च्या घरात पुन्हा एन्ट्री, स्पर्धकांना त्यांची जागा दाखवणार मध्यंतरी अक्षयने दिलेल्या एका मुलाखतीमध्ये 'हेरा फेरा ३'ची कथा आवडली नसल्याने चित्रपट करण्यास नकार दिल्याचं म्हटलं होतं. पण आता एक वेगळीच माहिती समोर आली आहे. 'आजतक'च्या वृत्तानुसार, 'हेरा फेरी ३'साठी अक्षयने तब्बल ९० कोटी रुपये मानधन मागितलं होतं. मानधनाबाबत अक्षय त्याच्या निर्णयावर ठाम होता. पण 'हेरा फेरी ३'साठी ९० कोटी रुपये अक्षयला देण्यास निर्मात्यांनी स्पष्ट शब्दांमध्ये नकार दिला. त्यानंतर कार्तिकला या चित्रपटाच्या भूमिकेसाठी विचारणा करण्यात आली. तो हा चित्रपट ३० कोटी रुपयांमध्ये करण्यास तयार झाला असल्याचं बोललं जात आहे. आणखी वाचा - “माझ्यावर खोटे आरोप…” विकास सावंतच्या वागण्याला कंटाळून ढसाढसा रडू लागली अपूर्वा नेमळेकर, नेमकं काय घडलं? 'हेरा फेरी ३'चे निर्माते फिरोज नाडियाडवाला अक्षयवर नाराज असल्याच्याही चर्चा आहेत. अक्षयने 'हेरा फेरी ३'च्या कथेबाबत जे भाष्य केलं त्यामुळे फिरोज त्याच्यावर नाराज आहेत. दरम्यान फिरोज यांच्या 'वेलकम ३', 'आवारा पागल दिवाना २' या चित्रपटांमध्येही अक्षय काम करणार नसल्याचं आता समोर आलं आहे.