बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यप हा भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रभावशाली चित्रपट निर्मात्यांपैकी एक आहे. आपल्या हटके शैलीसाठी आणि नव्या प्रतिभावान कलाकारांना काम देण्यासाठी तो ओळखला जातो. त्याच्या चित्रपटात बॉलीवूडमधील आघाडीचे कलाकार नसले तरी चित्रपट हिट होतात.

नुकतंच अनुरागने बॉलिवूडविषयी भाष्य केलं आहे. भारतीय चित्रपटसृष्टीत सध्या ‘जमीनदारी’ वृत्ती पाहायला मिळत असल्याचं अनुरागने स्पष्ट केलं आहे. याबरोबरच चित्रपटसृष्टीतील इतरही काही समस्यांबद्दल अनुरागने उघडपणे भाष्य केलं.

आणखी वाचा : शाहरुख खानच्या ‘या’ सुपरहीट चित्रपटातून सचिन तेंडुलकर करणार होता बॉलिवूडमध्ये पदार्पण, पण…

‘इ-टाइम्स’शी संवाद साधताना अनुराग म्हणाला, “पितृसत्ताक म्हणण्यापेक्षा या वृत्तीला जमीनदारी वृत्ती म्हणणं जास्त योग्य होईल. सध्या चित्रपटसृष्टीत ही वृत्ती पाहायला मिळत आहे. कित्येक दिग्दर्शक स्वतःच्या फायद्यासाठी समोरच्या व्यक्तीवर वर्चस्व गाजवू पाहत आहेत. कित्येक जण मला आजही नवीन लोकांबरोबर काम करताना प्रॉफिट शेअरिंग आणि कॉंट्रॅक्ट करून काम करायचा सल्ला देतात पण ती माझी पद्धत नाही, मला कुणालाही माझं गुलाम म्हणून वागणूक द्यायला आवडणार नाही.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एवढंच नव्हे तर कित्येक कलाकार अनुरागबरोबर पुन्हा काम करण्यास उत्सुक असतात हेदेखील त्याने स्पष्ट केलं. नुकताच अनुराग कश्यप ‘हड्डी’ या चित्रपटात झळकला. याबरोबर अनुराग सध्या ‘बेबाक’ नावाच्या शॉर्टफिल्मचं दिग्दर्शन करतोय. शिवाय कान्स चित्रपट महोत्सवात अनुरागच्या ‘केनडी’ या चित्रपटाचं खूप कौतुक झालं, लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.