‘हेरा फेरी’ चित्रपटाने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. आजही हा चित्रपट अनेकजण आवर्जून बघतात. अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल या त्रिकुटाचा हा चित्रपट २००० मध्ये प्रदर्शित झाला होता. २००६ मध्ये या फ्रेन्चायझीचा दुसरा चित्रपट ‘हेरा फेरी २’ प्रदर्शित झाला. या दोन्ही चित्रपटांनी प्रेक्षकांचे खूप मनोरंजन केलं होतं. आता प्रेक्षक तिसऱ्या भागाची वाट बघत आहेत. अक्षय कुमार ऐवजी कार्तिक आर्यनला या चित्रपटात कास्ट केल्याने आधीच प्रेक्षक नाराज आहेत. पण कार्तिक आर्यनच्या आधी या चित्रपटाच्या निर्मात्यांनी या चित्रपटासाठी अभिनेता वरुण धवनला विचारणा केली असल्याचं समोर आलं आहे.

एका मिडीया रिपोर्टनुसार, अभिनेता वरुण धवन याने या चित्रपटात ‘राजू’ची भूमिका साकारावी अशी या चित्रपटाच्या निर्मात्यांची इच्छा होती. त्याप्रमाणे या चित्रपटाचे निर्माते आनंद पंडित आणि फिरोज नाडियादवाला यांनी कार्तिक आर्यनच्या आधी वरुण धवन ला या भूमिकेसाठी विचारलं होतं. परंतु त्याने या चित्रपटाला नकार दिला.

Salman Khan firing case Facebook account named Anmol Bishnoi was opened on same day of shooting
अभिनेता सलमान खान गोळीबार प्रकरण : गोळीबाराच्या दिवशीच अनमोल बिष्णोई नावाचे फेसबुक खाते उघडले
Kangana Ranaut Buys Mercedes
निवडणूकीपूर्वी अभिनेत्री कंगना रणौतने खरेदी केली महागडी लक्झरी कार; किंमत पाहून तुम्हालाही फुटेल घाम
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!
Aarti Singh To Marry Boyfriend Deepak Chauhan
प्रसिद्ध अभिनेत्री ३९ व्या वर्षी करतेय अरेंज मॅरेज, नवी मुंबईचा आहे होणारा पती; म्हणाली, “माझ्या आयुष्यात…”

आणखी वाचा : गश्मीर महाजनी बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज, ‘या’ सुप्रसिद्ध अभिनेत्रीबरोबर झळकणार प्रमुख भूमिकेत

वरुणला अक्षय कुमारबद्दल अत्यंत आदर वाटतो. त्यामुळे फिरोज नाडियाडवाला आणि अक्षय कुमार यांच्यातल्या मतभेदांचा वरुणला फायदा घ्यायचा नव्हता. राजूची भूमिका अक्षय कुमारच उत्कृष्ट प्रकारे निभावू शकतो असं कारण देत त्याने या चित्रपटाला नकार दिला होता असं समोर आलं आहे. फक्त वरुणच नाही तर त्याचे वडील डेव्हिड धवन यांनीही या चित्रपटाची एक ऑफर नाकारली आहे.

हेही वाचा : करण जोहरने विकी कौशलला दिली ‘स्टुडंट ऑफ द इअर ३’ची ऑफर, अभिनेता म्हणाला…

अक्षय कुमार ‘हेरा फेरी ३’मधून बाहेर पडल्याने सगळेच चाहते चांगले नाराज झाले आहेत. काही दिवसांपूर्वीच एका मुलाखतीदरम्यान आपल्याला काही गोष्ट पटल्या नाहीत म्हणून त्यातून बाहेर पडल्याचं अक्षयने कबूल केलं होतं. तसंच त्याने प्रेक्षकांची त्याबद्दल माफीही मागितली होती. पण परेश रावल आणि सुनील शेट्टी यांच्याबरोबरच अक्षय कुमारही हवाच अशी चाहत्यांनी मागणी केली आहे. या तिघांशिवाय हा चित्रपट बनूच शकत नाही आणि बनला तरी तो आम्ही बघणार नाही असा पवित्रा प्रेक्षकांनी घेतला आहे.