Karisma Kapoor Sunjay Kapur Wedding after breaking engagement with Abhishek Bachchan : बॉलीवूड अभिनेत्री करिश्मा कपूरचा एक्स पती संजय कपूरचं निधन झालं आहे. संजय कपूरशी लग्न करण्याआधी करिश्माचा साखरपुडा अभिषेक बच्चनशी झाला होता. अभिषेक व करिश्मा प्रेमात होते आणि त्यांचं नातं घरच्यांना मान्य असल्याने या दोघांनी लग्न करायचं ठरवलं होतं. चित्रपटसृष्टीतील दोन मोठे कुटुंब या लग्नाची तयारी करत होती. बच्चन आणि कपूर कुटुंब लग्नाबद्दल खूप आनंदी होते. पण त्यानंतर करिश्मा व अभिषेक यांच्यात बिनसलं आणि हे नातं तुटलं. करिश्मा व अभिषेकचा साखरपुडा का मोडला? ते जाणून घेऊयात.
करिश्मा व अभिषेकच्या लग्नाची घोषणा जया बच्चन यांनी अमिताभ बच्चन यांच्या ६० व्या वाढदिवशी केली होती. करिश्मा व अभिषेक खूप चांगले मित्र होते, अभिषेक बच्चनची बहीण श्वेता बच्चन हिचे राज कपूर यांचा नातू निखिल नंदाशी लग्न झाल्यानंतर ही मैत्री आणखी घट्ट झाली. दोन्ही कुटुंबात जवळचं नातं होतं.
५ वर्षे डेट केल्यावर केलेला साखरपुडा
करिश्मा व अभिषेकही एकमेकांच्या जवळ आले. जेव्हा अमिताभ यांना हे समजलं, तेव्हा त्यांनीही या नात्याला होकार दिला. अभिषेक-करिश्माने ‘हां मैंने भी प्यार किया है’ या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. ५ वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर करिश्मा-अभिषेकने लग्नाचा निर्णय घेतला. एका मुलाखतीत करिश्माने सांगितलं होतं की अभिषेकने तिला हिऱ्याची अंगठी देऊन प्रपोज केलं होतं. पण साखरपुडा झाल्यानंतर अवघ्या ४ महिन्यात दोघांचे ब्रेकअप झाले.
अभिषेक व करिश्मा यांनी जानेवारी २००३ मध्ये साखरपुडा मोडला. अभिषेक-करिश्माचं नातं का तुटलं, याचं कारण स्पष्ट नाही. पण मीडिया रिपोर्ट्सनुसार, बच्चन कुटुंबाची इच्छा होती की लग्नानंतर करिश्माने चित्रपटांमध्ये काम करू नये. त्यावेळी करिश्मा आघाडीची अभिनेत्री असल्याने तिने बच्चन कुटुंबाची ही अट मान्य केली नाही. दुसरीकडे, करिश्माची आई बबिता कपूर यांच्यामुळे या दोघांचं ब्रेकअप झालं, असं म्हणतात. यानंतर काही महिन्यांनी सप्टेंबर महिन्यात करिश्माने दिल्लीतील उद्योगपती संजय कपूरशी लग्न केले.

लग्नानंतर काही काळाने संजय करिश्माला मारहाण करायला सुरुवात केली. त्यामुळे करिश्मा तिच्या करिअरवर लक्ष केंद्रित करू शकली नाही. करिश्मा कपूरने म्हटलं होतं की लग्नाच्या काही वर्षांपर्यंत सर्व काही ठीक होतं, पण ५ ते ६ वर्षांनी संजय आणि करिश्मामध्ये दुरावा निर्माण झाला. करिश्मा कपूर मेकअपने मारहाणीच्या जखमा लपवत असे, हनिमूनला संजयने करिश्माला त्याच्या मित्रांबरोबर रात्र घालवण्यास बळजबरी केली होती, असा आरोप अभिनेत्रीने केला होता.
लग्नानंतर ११ वर्षांनी २०१४ मध्ये करिश्माने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. त्यानंतर २ वर्षांच्या कायदेशीर प्रक्रियेनंतर २०१६ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर संजयने प्रिया सचदेवशी लग्न केलं होतं.