अभिनेता आमिर खानने किरण रावशी दुसरं लग्न केलं होतं. आमिर व रीना दत्ता यांचा घटस्फोट झाल्यावर त्याने किरणशी लग्न केलं होतं. किरण चश्मा लावते, त्यामुळे आमिरशी लग्न केल्यावर खूप ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता, असा किरण रावने खुलासा केला आहे. लोक तिच्या लूकची खिल्ली उडवायचे, असं ती म्हणाली. किरण व आमिर तीन वर्षांपूर्वी विभक्त झाले आहेत. पण ते त्यांच्या मुलाचा एकत्र सांभाळ करतात.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत किरणने महिला दिग्दर्शकांना त्यांचे चित्रपट प्रदर्शित करताना येणाऱ्या आव्हानांबद्दल विधान केलं. इंडस्ट्रीमध्ये पुरुषांच्या तुलनेत महिलांना मिळणाऱ्या सन्मानाबद्दल ती बोलली. याचबरोबर तिने आमिर खानशी लग्न केल्यावर झालेल्या टीकेबाबतही सांगितलं.

“ती माझ्यावर ओरडते”, घटस्फोटानंतर किरण रावसह काम करण्याबाबत आमिर खान म्हणाला, “आम्ही एकत्र…”

किरणने आमिरशी लग्न केल्यानंतर तिला ट्रोल करण्यात आलं होतं. ‘कोणत्या चश्मिष महिलेशी आमिर खानने लग्न केलंय?’, असं लोक म्हणायचे. लोकांचं विविध प्रकारचं बोलणं ऐकूनही आपण नेहमीच आपल्या स्वातंत्र्याला महत्त्व दिलं आणि आपलं काम सुरू ठेवलं, असं ती सांगते. तसेच आता मी अशा टप्प्यावर पोहोचली आहे जिथे इतरांच्या मतांना मी महत्त्व देत नाही, असंही तिने नमूद केलं.

रीनाने घटस्फोनंतरही आमिर खानच्या कुटुंबाला सोडलं नाही, किरण रावचा खुलासा; म्हणाली, “माझं लग्न झालं तेव्हा ती…”

किरणच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास नुकताच तिचा ‘लापता लेडीज’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेला हा चित्रपट हिट झाला. प्रेक्षकांकडून या चित्रपटाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला.