IPL 2023 Final : आयपीएलच्या १६व्या हंगामातील अंतिम सामना सोमवारी(२९ मे) गुजरात टायटन्स व चेन्नई सुपर किंग्जमध्ये खेळवला गेला. या सामन्यात विजय मिळवत चेन्नई सुपर किंग्जने आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरलं. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये रंगतदार सामना सुरू असतानाच पाऊस आल्याने मॅच मध्येच थांबवावी लागली. पाऊस थांबल्यानंतर मैदान कोरडं करण्यासाठी अनेक प्रयत्न केले गेले.

आयपीएलच्या अंतिम सामन्यातील काही फोटो बॉलिवूड अभिनेता व चित्रपट समीक्षक कमाल आर खानने(केआरके) ट्वीटर अकाऊंटवरुन शेअर केले आहेत. “बीसीसीआय ही डिजिटल भारतातील श्रीमंत संस्थांपैकी एक आहे. अमृतकालमधून हजारो कोटींचा खर्च करुन बीसीसीआयने अहमदाबादमध्ये सर्वौत्तम असणाऱ्या स्टेडियमपैकी एक असे स्टेडियम बनवले. आयपीएल २०२३च्या फायनलमध्ये पाऊस पडला आणि मैदान कोरडं करण्यासाठी स्टाफकडून प्रयत्न केले गेले. इतर देशात मैदान कोरडे करण्यासाठी मशिनचा वापर केला जातो,” असं ट्वीट त्याने केलं आहे.

chala hawa yeu dya fame bharat ganeshpure entry in zee marathi shiva serial
‘चला हवा येऊ द्या’ संपल्यावर लोकप्रिय अभिनेत्याची ‘झी मराठी’च्या ‘शिवा’ मालिकेत एन्ट्री, पाहा प्रोमो
bhuvan bam comments on prathamesh parab recent video
प्रथमेश परबच्या व्हिडीओवर लोकप्रिय अभिनेत्याची कमेंट; म्हणाला, “क्षितिजा तुझा नवरा खूप…”
Raghu Ram blames the MTV show for his divorce
“रोडीजमुळे माझा घटस्फोट झाला,” प्रसिद्ध अभिनेत्याचं विधान; म्हणाला, “माझ्या वैयक्तिक आयुष्यात…”
Pakistani actor Imran Abbas claims he was offered Aashiqui 2
“आशिकी २, पीके, हीरामंडीची ऑफर मिळाली होती,” पाकिस्तानी अभिनेत्याचा दावा; म्हणाला, “महेश भट्ट…”

केआरकेने आयपीएलच्या अंतिम सामन्यातील फोटो शेअर करत केलेलं हे ट्वीट सध्या चर्चेत आहे. या ट्वीटवर अनेकांनी कमेंटही केल्या आहेत.

हेही वाचा>> IPL 2023 Final GT vs CSK: देशी उपाय! पावसाच्या पाण्यानं ग्राऊंड्समन्सची तारांबळ, पाणी सुकवण्यासाठी थेट स्पंजनंच केली सुरुवात

आयपीएलचा अंतिम सामना रविवारी(२८ मे) पार पडणार होता. परंतु, पावसामुळे हा सामना राखीव दिवशी म्हणजेच २९ मेला खेळवला गेला. प्रथम फलंदाजी करताना गुजरातने २० षटकांत ४ गडी गमावून २१४ धावा केल्या. यानंतर पावसामुळे डकवर्थ लुईस नियमानुसार चेन्नईला १५ षटकांत १७१ धावांचे लक्ष्य मिळाले. रवींद्र जडेजाने मोहित शर्माच्या शेवटच्या षटकातील दोन चेंडूवर षटकार आणि चौकार मारत रोमहर्षक विजय मिळवला. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली पाचव्यांदा ट्रॉफी जिंकल्यानंतर चेन्नईच्या चाहत्यांकडून आनंद व्यक्त केला जात आहे.