Sharmila Tagore Once Stayed In Chowkidars Room: दिग्गज चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक सत्यजित रे हे त्यांच्या चित्रपटांसाठी ओळखले जातात. आता त्यांचा १९७० मध्ये प्रदर्शित झालेला अरण्यार दिन रात्री हा चित्रपट सध्या चर्चेत आहे.
सध्या सुरू असलेल्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘अरण्येर दिन रात्रि’ हा चित्रपट दाखवण्यात आला. या चित्रपटात सौमित्र चॅटर्जी, शुभेंदू चॅटर्जी, समित भांजा, रबी घोष, शर्मिला टागोर, काबेरी बोस, सिमी गरेवाल आणि अपर्णा सेन यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये जेव्हा हा चित्रपट दाखवण्यात आला, तेव्हा सिमी गेरवाल व शर्मिला टागोर तिथे उपस्थित होत्या.
मी सत्यजीत रे यांना नकार देऊ शकत नव्हते…
माझ्या नंतर लक्षात आले की, ‘मेरे सपनो की रानी’ या चित्रपटासाठी मी शक्ती सामंत यांना मे महिन्यासाठीच होकार दिला होता. मग मी शक्ती सामंत यांच्याकडून वेळ मागून घेतला आणि सत्यजित रे यांच्या अरण्येर दिन रात्रि या चित्रपटाच्या शूटिंगसाठी गेले. मी सत्यजित रे यांना नकार देऊ शकत नव्हते. कारण- मला त्यांच्याविषयी आदर वाटायचा. ते माझ्या वडिलांप्रमाणे होते.
शर्मिला टागोर पुढे म्हणाल्या, “‘अरण्येर दिन रात्रि’च्या शूटिंगदरम्यान जागेची कमी होती, त्यामुळे आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी राहत होतो. सिमी गरेवाल व कावेरी बोस या जवळच्या एका गावातील बंगल्यात राहत होत्या. सत्यजित रे, सौमित्र चॅटर्जी आणि इतर क्रू मेंबर्ससह दुसऱ्या ठिकाणी राहिले. समित भांजा, शुभेंदु चॅटर्जी, रबी घोष आणि मी दुसऱ्या ठिकाणी राहिलो.”
शर्मिला टागोर पुढे म्हणाल्या, “‘अरण्येर दिन रात्रि’च्या शुटिंगदरम्यान जागेची कमी होती, त्यामुळे आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी राहत होतो. सिमी गरेवाल व काबेरी बोस हे जवळच्या एका गावातील बंगल्यात राहत होत्या. सत्यजित रे, सौमित्र चॅटर्जी आणि इतर क्रू मेंबर्ससह दुसऱ्या ठिकाणी राहिले. समित भांजा, शुभेंदु चॅटर्जी, रबी घोष आणि मी दुसऱ्या ठिकाणी राहिलो.”
“मी एका चौकीदाराच्या खोलीत राहिले. माझ्याकडे एक वॉटर कूलर होता. कोरड्या हवामानात तो वॉटर कूलर उपयोगी पडत असे. तिथे खूप उष्णता होती. तिथल्या उष्णतेची कोणीही कल्पना करू शकत नाही. तेथील वातावरणामुळे सकाळी साडेपाच ते साडेनऊ आणि संध्याकाळी ३ ते ६ या वेळेतच काम केले जायचे. इतर वेळात आम्ही एकमेकांचे खूप चांगले मित्र बनलो”, असे शर्मिला टागोर यांनी सांगितले.
सत्यजित रे यांनी शूटिंग करण्यासाठी मे महिना का निवडला, याबद्दल शर्मिला टागोर म्हणाल्या, “त्या काळात झाडांना पाने नसतात. त्यांना चित्रपटात तशी दृश्ये हवी होती. पावसाळ्यानंतर झाडांना पालवी फुटते आणि त्यामुळे त्यांना पाहिजे असलेले सीन उन्हाळ्यातच शूट केले जाणे शक्य होते.”
‘अरण्येर दिन रात्रि’ हा बंगाली सिनेमा आहे. सुनील गंगोपाध्याय यांच्या ‘अरण्येर दिन रात्रि’ या कादंबरीवर आधारित हा सिनेमा आहे. या चित्रपटाचे शूटिंग प्रामुख्याने झारखंडमधील पलामू या भागात झाले आहे.