Suniel Shetty Reveals Truth About Aamir Khan Carries Pistol: एकेकाळी बॉलीवूड आणि मुंबईतील अंडरवर्ल्डचे एकमेकांशी जवळचे संबंध असल्याच्या चर्चा होत्या. १९९० आणि २००० च्या दशकात बॉलीवूडच्या कलाकारांना खंडणीचे फोन आणि धमक्या येत असत. मुंबईतील अनेक माफिया ब्लॅक मनीद्वारे बॉलीवूड चित्रपटांसाठी बजेट निर्माण करून देत असत. तसंच कास्टिंगच्या प्रक्रियेतही त्यांचा सहभाग असायचा असं म्हटलं जातं.
अंडरवर्ल्डच्या भितीपोटी बॉलीवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ आमिर खानने त्याच्याकडे बंदूक ठेवण्यास सुरुवात केल्याच्या अफवा पसरल्या होत्या. याबद्दल सुनील शेट्टीने एक जुना किस्सा शेअर केला आहे आणि त्याने आमिरच्या सुरक्षेबद्दलचं नेमकं सत्य सांगितलं आहे. अंडरवर्ल्डकडून धमक्या मिळाल्यानंतर आमिर खानने स्वत:जवळ बंदूक ठेवण्यास सुरुवात केल्याच्या अफवा पसरल्या होत्या.
याबद्दल एका मुलाखतीदरम्यान चाहत्याने सुनील शेट्टीला विचारले की, ‘आमिर खानबद्दल असे म्हटले जाते की, तो धमक्यांमुळे पिस्तूल बाळगू लागला होता. याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे?’ यावर उत्तर देताना सुनील शेट्टी म्हणतो, “हा सगळा मूर्खपणा आहे. तुम्ही जे ऐकता आणि वाचता ते नेहमीच खरं नसतं. आम्ही इथे पूर्णपणे सुरक्षित आहोत.”
‘सितारे जमीन पर’मुळे आमिर खान चर्चेत
दरम्यान, आमिर खानच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, सध्या तो त्याच्या आगामी ‘सितारे जमीन पर’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. सध्या तो प्रमोशननिमित्ताने ठिकठिकाणी मुलाखती देत आहेत. या चित्रपटात त्याने अभिनयाव्यतिरिक्त निर्मात्याची भूमिकादेखील साकारली आहे. या चित्रपटात त्याच्याबरोबर अभिनेत्री जिनिलीया देशमुखही मुख्य भूमिकेत आहे.
हृदयस्पर्शी आणि प्रेरणादायी कथा असलेला ‘तारे जमीन पर’ हा चित्रपट आर. एस. प्रसन्ना यांनी दिग्दर्शित केला आहे, तर आमिर खानने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. ‘सितारे जमीन पर’ चित्रपटात आरुष दत्ता, गोपी कृष्ण वर्मा, सम्वित देसाई, वेदांत शर्मा, आयुष भन्साली, आशिष पेंडसे, ऋषी शहानी, ऋषभ जैन, नमन मिश्रा आणि सिमरन मंगेशकर हे नवीन चेहरे आहेत. येत्या २० जून २०२५ पासून हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे
‘सितारे जमीन पर’बद्दल चाहत्यांच्या अपेक्षा
याशिवाय, आमिर खानच्या निर्मिती संस्थेअंतर्गत ‘लाहोर १९४७’ हा चित्रपटही बनवला जात आहे. या चित्रपटात सनी देओल आणि प्रीती झिंटा हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. आमिरने याआधी ‘लाल सिंग चड्ढा’ हा चित्रपट केला होता. पण बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने फारशी चांगली कामगिरी केली नाही. हा चित्रपट फ्लॉप ठरला होता. त्यामुळे आता त्याच्या चाहत्यांना आगामी चित्रपटांकडून खूप अपेक्षा आहेत.