बॉलीवूडमधील आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये विकी कौशलचे नाव घेतले जाते. विकीने २०२१ मध्ये बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री कतरिना कैफबरोबर लग्नगाठ बांधली. परंतु कतरिनाशी लग्न होण्यापूर्वी अभिषेक बच्चनने विकीला वैवाहिक आयुष्याबाबत सल्ला दिला होता. याबाबत विकीने एका मुलाखतीदरम्यान खुलासा केला होता.

हेही वाचा : “आधी मित्रांना ब्रेकअपविषयी सल्ला द्यायचो, पण…” रणबीर कपूरने सांगितली ‘ती’ आठवण, म्हणाला…

विकी कौशलने ‘ब्राइड्स टुडे’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले, “मला २०१८ मध्ये अभिषेक बच्चनकडून वैवाहिक आयुष्याबाबत एक सल्ला मिळाला होता. ‘जेव्हा तुझे लग्न होईल तेव्हा रात्री झोपण्यापूर्वी आपल्या बायकोला सॉरी म्हणायचे आणि त्यानंतर सकाळी उठल्यावरसुद्धा बायकोला सॉरी म्हणायचे, असे केलेस तरच तू खूप आनंदी राहशील.'” तसेच वयाची ३० वर्षे पूर्ण झाल्यावर मी लगेच लग्नाचे प्लॅनिंग करणार, असेही काही वर्षांपूर्वी विकीने सांगितले होते.

हेही वाचा : “पैसे आल्यानंतर आम्ही ‘मन्नत’ बंगला खरेदी केला, पण…” शाहरुखने सांगितला ‘तो’ किस्सा, म्हणाला, “मी गौरीला…”

विकी कौशलने ९ डिसेंबर २०२१ रोजी कतरिनासह लग्न केले. राजस्थानमध्ये कुटुंबातील मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत कॅट-विकीने लग्नगाठ बांधली. दोघेही सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे अनेक फोटो पोस्ट करत असतात. या अभिनेत्याला ‘जरा हटके जरा बचके’च्या ट्रेलर लॉंचदरम्यान कतरिनापेक्षा चांगली बायको मिळाली, तर तिला सोडणार का, असा प्रश्न विचारला होता. यावर, “मला असे प्रश्न विचारू नका, घरी जायचे आहे,” असे मजेशीर उत्तर देत, जन्मोजन्मी कतरिनाच बायको म्हणून हवी असल्याचे विकीने नमूद केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, विकीचा ‘जरा हटके जरा बचके’ चित्रपट २ जूनला प्रदर्शित होणार असून यामध्ये त्याच्याबरोबर सारा अली खान मुख्य भूमिकेत दिसणार आहे. प्रेक्षकांना अनेक दिवसांपासून विकीच्या ‘सॅम बहादूर’ चित्रपटाचीसुद्धा प्रतीक्षा आहे.