‘असुर’ या वेब सीरिजचे दुसरे पर्व तब्बल तीन वर्षांनी १ जून रोजी प्रेक्षकांना पाहायला मिळाले. पहिल्या पर्वाप्रमाणेच दुसऱ्या पर्वाचीही जोरदार चर्चा होती, या सीरिजच्या दोन्ही पर्वांना प्रेक्षकांची खूप पसंती मिळाली. १५ दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या वेब सीरिजची चांगलीच चर्चा होत आहे. या सीरिजमध्ये मराठमोळा अभिनेता अमेय वाघची महत्त्वाची भूमिका होती. त्याने यामध्ये रसूल नावाचं पात्र साकारलं होतं.

शशांक केतकरचा साताऱ्यातील वडिलोपार्जित वाडा पाडून इमारत उभारली जाणार; अभिनेता भावुक होत म्हणाला, “खूप आठवणी…”

guardian minister post Raigad District BJP shiv sena NCP Eknath Shinde Aditi Tatkare Bharat Gogawle
रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा कायम असताना भाजपची नवी खेळी
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Shashank Ketkar
“इतकं करूनही शेवटी…”, अभिनेता शशांक केतकरने व्यक्त केली खंत; म्हणाला, “मागच्या १४ वर्षांत…”
Ramesh Deo
मुंबईतील ‘या’ रस्त्याला दिले दिवंगत अभिनेते रमेश देव यांचे नाव; अजिंक्य देव भावना व्यक्त करत म्हणाले, “त्यांनाही निश्चितच आनंद…”
Bhandara, Tiger, Raveena Tandon ,
भंडारा : दोन जणांचा बळी घेणाऱ्या ‘त्या’ वाघासाठी खुद्द अभिनेत्री रविना टंडनचा ‘कॉल’
Sharayu Sonawane
मालिकांच्या महासंगमाबाबत ‘पारू’ फेम शरयू सोनावणे काय म्हणाली? घ्या जाणून…
Pankaja Munde on Dhananjay Munde
“धनंजय मुंडे फडणवीस-पवारांचे खास, राजीनामा मागणार नाहीत”, क्षीरसागरांच्या दाव्यावर पंकजा मुंडेंचं दोन वाक्यात उत्तर; म्हणाल्या…
Ajit Rajgond sentenced to six days in forest custody may have hunted ten tigers in 11 years
बहेलियांकडून दहा वाघांची शिकार ! ७० लाखांचा व्यवहार !

अमेय वाघने एका मुलाखतीत त्याच्यासाठी रसूलचं पात्र साकारणं किती अवघड होतं, याबद्दल खुलासा केला आहे. ‘इंडिया टुडे’शी बोलताना अमेय म्हणाला, “अभिनेता म्हणून शूटिंगवेळी ते पात्र साकारणं, अभिनय करणं आणि नंतर नॉर्मल होणं हे माझं काम असतं. पण असुरच्या शुटिंगवेळी मी नेहमीसारखा नव्हतो. थोडा विचित्र वागत होतो, पहिल्या सीझनमध्ये हे जास्त जाणवलं. कदाचित माझ्या पात्रामुळे असं झालं असावं.”

‘असु’र ही एक सायकोलॉजिकल थ्रिलर वेब सीरीज आहे. या सीरिजचे पहिले पर्व २ मार्च २०२० रोजी प्रदर्शित झाले होते. त्यानंतर आता सव्वातीन वर्षांनी १ जून २०२३ रोजी याचे दुसरे पर्व प्रेक्षकांच्या भेटीला आहे. या सीरिजमध्ये अर्शद वारसी, बरुण सोबती, रिद्धी डोगरा, अनप्रिया गोएंका, गौरव अरोरासह अनेक कलाकार होते.

Story img Loader