वेगळ्या धाटणीची कथा, मालिकेत असणारे कलाकार, नानाविध प्रकारची पात्रे यामुळे मालिका प्रेक्षकांना आवडतात; त्या त्यांच्या रोजच्या जीवनाचा भाग बनतात. आपली आवडती पात्रं नाराज असली की प्रेक्षकांनाही वाईट वाटते, ते आनंदी असले की प्रेक्षकही खूश असतात, एखादा विनोद आवडल्यावर प्रेक्षक खळखळून हसत त्याला प्रतिसाद देतात, त्यामुळे मालिकांचे प्रेक्षकांच्या आयुष्यात वेगळे स्थान असल्याचे पाहायला मिळते. आता झी मराठी वाहिनीवर प्रदर्शित होणारी ‘पुन्हा कर्तव्य आहे’ ही अशा मालिकांपैकी एक आहे. या मालिकेत नवे वळण येणार असल्याचे दिसत आहे.

आकाश संकटात सापडणार

झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर ‘पुन्हा कर्तव्य आहे’ या मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोच्या सुरुवातीला पाहायला मिळते की, आकाश ‘बनी’ असे ओरडत एका अंधाऱ्या ठिकाणी गेला आहे. कोणी आहे का तिकडे? असे ओरडताना दिसत आहे. त्याला पाहिल्यानंतर तोंडावर मास्क असलेली आणि हातात बंदूक असलेली व्यक्ती त्याला ओरडून सांगते, बॅग तिकडेच ठेव आणि निघ. आकाश म्हणतो, मला आधी बनीला बघायचं आहे, त्याशिवाय मी पैसे देणार नाही. आकाश त्याच्या लहान भावाला फोन करतो आणि विचारतो, बनी घरी आला? त्यावर त्याचा भाऊ अखिल हो असे सांगतो. हे ऐकल्यानंतर पैशांची बॅग तिथेच टाकून आकाश परत जायला निघतो, तितक्यात तिथे वसुंधरा येते. ती त्याला म्हणते, “एकटेच गेलात, काळजी वाटत होती.” आकाश तिला म्हणतो, “बनी सुखरुप घरी पोहोचला आहे.” वसुंधरा त्याच्यासमोर रडत हात जोडते आणि त्याच अवस्थेत जमिनीवर बसते. तितक्यात आकाशवर कोणीतरी गोळी झाडते. आकाशला गोळी लागते आणि तो खाली कोसळतो. वसुंधरा मोठ्याने आकाशराव असे ओरडते.

‘पुन्हा कर्तव्य आहे’ या मालिकेचा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, “बनीचा जीव वाचवताना आकाशचा जीव धोक्यात….!”, अशी कॅप्शन दिली आहे.

मालिकेत दाखविल्याप्रमाणे आकाश आणि वसुंधरा या दोघांचेही हे दुसरे लग्न आहे. आकाशच्या पहिल्या पत्नीचे निधन झाले आहे, तर वसुंधराचा घटस्फोट झालेला असतो; मात्र आकाश व त्याच्या कुटुंबाला वसुंधराच्या नवऱ्याचे निधन झाले आहे, असे सांगितले जाते. वसुंधराचा पहिला नवरा शार्दुल लकी हे नाव घेऊन पुन्हा तिच्या आयुष्यात येतो. तिला त्रास द्यायला, ब्लॅकमेल करायला सुरुवात करतो. वसुंधरा या सगळ्याचा धीराने सामना करते. मात्र, बनी घरातून गायब होतो, तेव्हा तिला वाटते की हे सर्व शार्दुलने केले आहे. या सगळ्यात ती तिच्या सासरच्यांना शार्दुल ऊर्फ लकी तिचा पहिला पती असल्याचे सांगते. हे ऐकल्यानंतर आकाशला धक्का बसतो.

हेही वाचा: मुंबई-कर्जत ते मढ Island…; ‘ठरलं तर मग’ फेम जुई गडकरीने मतदानासाठी ‘असा’ केला प्रवास, म्हणाली…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, आकाशला गोळी कोणी मारली, बरा झाल्यानंतर आकाश वसुंधराला माफ करणार का, पुढे त्यांचे नाते कसे असणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.