सुरुवातीपासूनच वर्ष भीमा कोरेगाव ही घटना चांगलीच चर्चेत आहे. यावरून बरेच मतभेद होताना दिसतात. अनेकजण याबद्दलची त्यांची मतं मांडत असतात. आता अभिनेते अरुण कदम यांनी याबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून आज प्रेक्षकांचं मनोरंजन करत असलेले अरुण कदम सोशल मीडियावरही चांगलेच सक्रिय असतात. वेगवेगळ्या पोस्ट शेअर करते त्यांचे विचार, त्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या घडामोडी चाहत्यांशी शेअर करत असतात. आता नुकतीच त्यांनी एक पोस्ट शेअर केली, ज्याकडे सगळ्यांचे लक्ष वेधलं आहे.

sangli accident, sugarcane cutter death, 4 sugarcane cutters died sangli
सांगली: ऊस तोडणी मजुरांच्या ट्रॅक्टरला ट्रकची धडक; ४ ठार, १० जखमी
CM Eknath Shinde
शिवसेनेच्या ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर, ‘या’ नेत्याचं नाव नसल्याने राजकीय वर्तुळात चर्चा
MP Supriya Sule On Vanchit Bahujan Aghadi
वंचित बहुजन आघाडी अन् महाविकास आघाडीच्या युतीचे काय झाले? खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या…
Maharashtra
मुद्दा महाराष्ट्राचा… महाराष्ट्र समस्यांच्या विळख्यात का?

आणखी वाचा : …आणि जिनिलीया देशमुखने मानले सायली संजीवचे हात जोडून आभार, जाणून घ्या नक्की काय झालं

हेही वाचा : “स्वतःला कमी लेखू नका…” रोहित शेट्टीसह फोटो शेअर करताच अरुण कदम ट्रोल, ‘त्या’ वक्तव्यामुळे लाडक्या दादूसवर प्रेक्षक नाराज

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २५ डिसेंबर १९२७ रोजी महाड येथे केलेल्या भाषणात त्यांनी केलेलं वक्तव्य अरुण कदम यांनी त्या पोस्टमधून शेअर केलं. या पोस्टमध्ये “विजयस्तंभ भिमा कोरेगाव ऐतिहासिक पुरावा” असं लिहित त्याखाली “तुम्ही शूर वीरांची संतान आहात ही गोष्ट काल्पनिक नव्हे, तर भीमा कोरेगावला जाऊन बघा, तुमच्या पूर्वजांची नावे तेथील विजयस्तंभावर कोरलेली आहेत. तो पुरावा आहे की, तुम्ही भेड बकरींची संतान नसून सिंहाचे छावे आहात.” असं लिहिलेलं आहे. तर त्याच खाली “डॉ. बाबासाहेब आंबेडकर (दिनांक २५.१२.१९२७ महाडचे भाषण)” असाही संदर्भ दिलेला आहे. आता त्यांची ही पोस्ट सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.