छोट्या पडद्यावरील अभिनेता विवेक सांगळे लोकप्रिय आहे. ‘आई माझी काळूबाई’, ‘लव्ह लग्न लोचा’ या मालिकांमधून विवेक घराघरात पोहोचला. कलर्स वाहिनीवरील ‘भाग्य दिले तू मला’ मालिकेने त्याला लोकप्रियता मिळवून दिली. विवेक या मालिकेत राजवर्धन ही प्रमुख नायिकाची भूमिका साकारुन प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.

विवेक सांगळेचा अभिनेता होण्याचा प्रवास सोपा नव्हता. या प्रवासात त्याला अनेक कठीण प्रसंगांचा सामना करावा लागला आहे. विवेकने नुकतीच ‘ईटाइम्स’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने खडतर प्रवसाच्या आठवणी सांगितल्या. विवेक म्हणाला “२००९-१० साली मी अभिनय क्षेत्रात काम शोधत होतो. त्या काळात सोशल मीडियाचा फारसा वापर केला जायचा नाही. त्यामुळे निर्माते कलाकारांचे फोटो व बायोडेटा मागवून घ्यायचे. मढ येथे अनेक मालिका व चित्रपटांच्या शूटिंगचे सेट लावले जायचे. केवळ बायोडेटा व फोटोकॉपी देण्यासाठी मला अनेकदा मढपर्यंत प्रवास करावा लागला आहे”.

हेही वाचा >> “मी थलावया आहे असं…” रजनीकांत यांच्याशी तुलना केल्यानंतर सुनील शेट्टीने दिलं स्पष्ट शब्दांत उत्तर

हेही वाचा >> “आपके बाप का…” अनुपम खेर यांनी सांगितला किशोर कुमार यांच्याबरोबर घडलेला ‘तो’ किस्सा

“कधी कधी खिशात पैसे नसल्यामुळे मला ऑडिशनलाही जाता यायचं नाही. पण कठीण प्रसंग व परिश्रमातून गेल्यानंतर मिळालेल्या यशामुळे मी आनंदी आहे. याशिवाय कदाचित मला यश म्हणजे काय असतं? यशाची किंमत काय? हे समजलं नसतं. त्या कठीण काळाने मला खूप काही शिकवलं आहे”, असंही विवेक पुढे म्हणाला.

आणखी वाचा >> “मला टकला मुलगा नवरा म्हणून…” अपूर्वा नेमळेकरने बिग बॉसच्या घरात केलेलं वक्तव्य चर्चेत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘भाग्य दिले तू मला’ मालिकेतील विवेक साकारत असलेली भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. या मालिकेत अभिनेत्री तन्वी मुंडले ‘कावेरी’ ही मुख्य नायिकेची भूमिका साकारत आहे. तर निवेदिता सराफ, अतुल महाजन, जान्हवी किल्लेकर हे कलाकरही महत्त्वाच्या भूमिका साकारत आहेत.