बिग बॉसच्या चौथ्या पर्वाची सध्या चर्चा आहे. नुकतंच ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वातून अभिनेत्री रुचिरा जाधव बाहेर पडली. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानतंर तिने तिच्या खासगी आयुष्याबद्दल भाष्य केले होते. त्यानंतर आता ती एका पोस्टमुळे चर्चेत आली आहे.

बिग बॉसच्या यंदाच्या पर्वामध्ये रुचिरा जाधव आणि डॉ. रोहित शिंदे हे रिअल लाईफ कपल सहभागी झाले होते. मात्र बिग बॉस मराठीच्या घरात रोहित आणि रुचिराचे मतभेद झाले. यानंतर तिने त्याला अनफॉलो केले होते. त्यामुळे त्यांच्या रिलेशनशिपच्या अनेक चर्चा रंगल्या आहेत. त्यातच आता रुचिराने तिच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. सध्या ती पोस्ट चांगलीच चर्चेत आहे.
आणखी वाचा : “मला लाखो रुपये दिले तरीही…” रोहितला इन्स्टाग्रामवरुन अनफॉलो करण्याबद्दल रुचिरा जाधव स्पष्टच बोलली

रुचिरा जाधवची इन्स्टाग्राम पोस्ट

“माझे प्रिय इन्स्टाग्राम फॉलोअर्स, मला तुमचे माझ्या प्रती असलेले प्रेम आणि चिंता कळते आहे. मी त्याचा नक्कीच आदर करते. पण जसं रुचिरा नेहमी म्हणते, इथे सगळ्यांच्या मनासारखं होईल आणि माझ्याही मनासारखं होईल.

मी समतोल साधणे आणि समानता यावर विश्वास ठेवते. मग ते नातं असू दे किंवा जीवन.

कृपया थोडा वेळ जाऊ द्यात. काही वेळासाठी मला शांततेची गरज आहे. असं म्हटलं जातं की वेळ सर्व काही ठिक करते आणि रुचिरा म्हणते की माझा कान्हा हे सर्व काही ठिक करेल. तुमचीच रुचिरा”, असे तिने या पोस्टमध्ये म्हटले आहे.

आणखी वाचा : फोटोशूटमुळे झालेली ओळख ते ‘बिग बॉस’ मराठीतील बोल्ड जोडी, अशी आहे रुचिरा आणि रोहितची लव्हस्टोरी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रुचिराने शेअर केलेल्या या पोस्टला तिने ‘प्रेम, विश्वास, शांतता’ असे तीन शब्दात कॅप्शन दिले आहे. तिच्या या कॅप्शनमुळे सध्या ती पोस्ट व्हायरल होत आहे. तिच्या या पोस्टवर अनेकजण कमेंट करतानाही दिसत आहेत. अनेकांनी तिचे समर्थन केले आहे. आम्ही तुझ्या बाजूने आहोत, असे तिला सांगितले आहे. सध्या तिची ही पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे.