‘होणार सून मी ह्या घरची’ हा मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता शशांक केतकर आजही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. ‘मुरांबा’ या लोकप्रिय मालिकेतून तो प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. शशांकनं आपल्या उत्तम अभिनयानं एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. मराठी मालिकाविश्वातील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी शशांक एक आहे. आता त्यानं मराठीबरोबर हिंदीतही छाप उमटवली आहे. अलीकडेच तो हंसल मेहता यांच्या ‘स्कॅम २००३’ (Scam 2003) या वेब सीरिजमध्ये झळकला आहे. शिवाय लवकरच तो करण जोहरच्या वेब सीरिजमध्येही पाहायला मिळणार आहे. अशा या लोकप्रिय अभिनेत्याने यंदा बाप्पाकडे एक मागणी केली आहे.

हेही वाचा – “चार दिवसांपूर्वी आमच्याकडे खूप वाईट गोष्ट घडली…”, ‘ठरलं तर मग’ फेम जुई गडकरीने सांगितला प्रसंग; म्हणाली…

‘तारांगण’ या एंटरटेन्मेंट मीडियाशी संवाद साधताना शशांकनं लाडक्या बाप्पाकडे एक मागणी केली आहे. तो म्हणाला की, “मी गणरायाकडे वेळ मागेन. कारण मला आता ऋग्वेदला वेळ देता येत नाहीये. मला यामुळे कसंतरी होतं असतं. जेव्हा सकाळी निघतो तेव्हा तो झोपलेला असतो आणि जेव्हा घरी परतो तेव्हा देखील तो झोपलेला असतो. जे आपण अनेक गोष्टी आणि गाण्यांमध्ये ऐकतो, तसं माझ्याबरोबर होतंय. त्यामुळे मी बाप्पाकडे वेळ मागेन जो मला माझ्या मुलासाठी द्यायचा आहे. तसेच सगळ्यांसाठी स्वास्थ, सगळीकडे स्वच्छता, शांतता नांदू दे अशी बाप्पाकडे प्रार्थना करेन.”

हेही वाचा – Bigg Boss 17: टेलीव्हिजनवरील ‘हा’ लोकप्रिय चेहरा बिग बॉसच्या १७व्या पर्वासाठी निश्चित; कधीपासून सुरू होणार जाणून घ्या

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, शशांकनं मालिका व्यतिरिक्त मराठी नाटक, चित्रपटात काम केलं आहे. ‘वन वे तिकीट’ या चित्रपटाच्या माध्यमातून त्यानं चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. त्यानंतर ‘३१ दिवस’, ‘आरॉन’ या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तसेच ‘गोष्ट तशी गमतीची’, ‘कुसुम मनोहर लेले’ यांसारख्या नाटकात सुद्धा त्यानं काम केलं आहे.