छोट्या पडद्यावरील ‘फुलाला सुगंध मातीचा’ ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेत किर्ती आणि शुभमच्या हटके लव्हस्टोरीने प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलं आहे. या मालिकेतील किर्ती, शुभम, जिजी अक्का, भाऊ, हे कलाकार कायमच चर्चेत असतात. ‘फुलाला सुगंध मातीचा’ ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक म्हणून ओळखली जाते. मात्र ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेचा शेवटचा भाग नुकतंच शूट करण्यात आला.

‘फुलाला सुगंध मातीचा’ या मालिकेत इमिली ही भूमिका साकारणारी अभिनेत्री मधुरा जोशी हिने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत सेटवरील सर्व गंमतीजमती पाहायला मिळत आहे. तिचा हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओला कॅप्शन देताना तिने शेवटचा दिवस असे म्हटले आहे. त्यामुळे ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे, यावर शिक्कामोर्तब झाला आहे.
आणखी वाचा : ‘फुलाला सुगंध मातीचा’ मालिका लवकरच घेणार प्रेक्षकांचा निरोप? अभिनेत्रीच्या पोस्टमुळे चर्चांना उधाण

“इमिली म्हणून आजचा शेवटचा दिवस. या प्रवासात मला ज्यांनी साथ दिली त्या प्रत्येकाचे आणि माझ्या सहकलाकारांचे मी आभार मानू इच्छितो. तुम्ही सर्वजण खूपच महान कलाकार आहात. या सर्व भावनिक आणि मजेशीर क्षणांसाठी धन्यवाद. हा प्रवास कायमच माझ्या लक्षात राहिल”, असे तिने म्हटले आहे.

आणखी वाचा : ‘झुंड’ चित्रपटातील अभिनेता प्रियांशू क्षत्रियला अटक; ५ लाखांचे दागिने लंपास केल्याचा आरोप

त्याबरोबर समृद्धी केळकरनेही इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली होती. यात ती आयपीएसच्या भूमिकेत फोटो पोस्ट केला होता. त्यावर तिने एकदा शेवटचं असं म्हटलं आहे. यावर तिने स्टार प्रवाह वाहिनीला टॅग केले आहे. त्याबरोबर तिने #किर्ती, #फुलाला सुगंध मातीचा, #प्रेम असे त्यांनी लिहिले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान स्टार प्रवाहवरील सर्वात जुनी मालिका म्हणून ‘फुलाला सुगंध मातीचा’ या मालिकेला ओळखले जाते. ही मालिका ‘फुलाला सुगंध मातीचा’ फार कमी वेळात प्रेक्षकांपर्यंत पोहोचली. मात्र मालिकेचं कथानक बदलताच मालिका कंटाळवाणी होत चालली होती. यामुळे ही मालिकेला ट्रोल केले जातं आहे. त्यानंतर आता अखेर ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. ती मालिका कधी संपणार याबद्दल काहीही माहिती अद्याप समोर आलेली नाही.