‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ ही मालिका गेल्या कित्येक वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. काही महिन्यांपूर्वीच या मालिकेने २५ वर्षांचा लीप घेतला. जयदीप-गौरीच्या पुनर्जन्माची कथा या मालिकेत सुरू झाली. त्यामुळे सध्या जयदीप-गौरी म्हणजेच पुनर्जन्म होऊन आलेल्या अधिराज-नित्याची कथा सुरू आहे. लवकरच मालिकेत काही कलाकार ‘आता होऊ दे धिंगाणा २’च्या पुढील भागात पाहायला मिळणार आहेत. याचे काही प्रोमो समोर आले आहेत. ज्यामध्ये लावणीच्या जुगलबंदीच्या प्रोमोने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

‘स्टार प्रवाह’च्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर ‘आता होऊ दे धिंगाणा २’च्या पुढील भागाचा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये नववर्षाच्या निमित्ताने धिंगाणापुरची जत्रा भरली आहे. या जत्रेमध्ये खास लावणीची जुगलबंदी पाहायला मिळणार आहे. ही लावणीची जुगलबंदी ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेतील शालिनी म्हणजे अभिनेत्री माधवी निमकर आणि नित्या म्हणजेच अभिनेत्री गिरीजा प्रभु यांच्यात पाहायला मिळणार आहे.

हेही वाचा – लग्नानंतर गौतमी देशपांडेची झाली ‘अशी’ अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली…

या प्रोमोमध्ये पिवळ्या रंगाच्या साडीत शालिनी दिसत आहे. ती घायाळ अदाकारीसह लावणी नृत्यू करताना दिसत आहे. तसेच नित्या एमजे स्टाइलमध्ये चंद्रा या गाण्यावर थिरकताना दिसत आहे. आता ही लावणीची जुगलबंदी कोण जिंकणार? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

हेही वाचा – Video: डेटवर जाण्यासाठी नकार, पण नंतर…; गौतमी देशपांडे आणि स्वानंद तेंडुलकरची फिल्मी लव्हस्टोरी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेने २५ वर्षांचा लीप घेतल्यापासून नवीन पात्र पाहायला मिळत आहेत. त्यामुळे अनेक जुन्या पात्राचा प्रवास संपला आहे. यापैकी एक म्हणजे शालिनी. शालिनी सध्या ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेत पाहायला मिळत नाहीये.