‘ठरलं तर मग’ मालिकेत सध्या अश्विनला त्याची गर्लफ्रेंड सोडून गेल्याचा सीक्वेन्स सुरू आहे. अश्विन हा अर्जुनचा लहान भाऊ असल्याने त्याला या कठीण प्रसंगातून बाहेर काढण्याची संपूर्ण जबाबदारी सायली स्वत: घेते. दुसरीकडे भावाची अवस्था पाहून अर्जुन सुद्धा व्यथित झालेला असतो. त्यामुळे येत्या भागात सायली अर्जुनला महत्त्वाचा सल्ला देणार असल्याचं प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

अश्विनची अवस्था पाहून अर्जुन सर्वांना ‘सगळ्या मुली अशाच असतात, फसवणूक करुन निघून जातात’ असा दोष देऊ लागतो. नवऱ्याच्या तोंडची वाक्य ऐकून, सायली अर्जुनला जोडीदाराचं महत्त्व काय असतं हे पटवून द्यायचं असा निर्धार करते. येत्या भागात अश्विन प्रकरणामुळे अर्जुन-सायलीच्या नात्यात नवीन वळण येणार असल्याचं प्रेक्षकांना पाहायला मिळेल.

book review creation lake by author rachel kushner
बुकरायण : विजेती न ठरली, तरी महत्त्वाची…
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
How important is sevens table in life | Inspirational Video
आयुष्यात सातचा पाढा किती महत्त्वाचा आहे! प्रत्येक आकडा सांगतो वयाचे महत्त्व, VIDEO एकदा पाहाच
Mohammed Siraj Take Stunning Overhead Catch of Shakib Al Hasan IND vs BAN Kanpur Test Watch Video
IND vs BAN: मोहम्मद सिराजचा ‘जिम्नॅस्टिकवाला कॅच’, हवेत मागच्या बाजूला डाईव्ह करत टिपला अनपेक्षित झेल; पाहा VIDEO
Palak Sindhwani Legal Battle Taarak Mehta Ka Ooltah Chashmah makers
“बदनाम करण्यासाठी…”, ‘तारक मेहता…’च्या निर्मात्यांवर अभिनेत्रीचे मानसिक छळाचे आरोप, मालिका सोडण्याचा निर्णय
Viswanathan Anand view on Gukesh Parde and Ding Liren World Chess Championship sport news
गुकेशचे पारडे जड, पण लिरेनकडून प्रतिकार अपेक्षित! जागतिक बुद्धिबळ लढतीबाबत विश्वनाथन आनंदचे मत
Murder of husband who is obstructing in immoral relationship
अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा खून; पत्नीसह प्रियकर गजाआड, आरोपींकडून आत्महत्येचा बनाव
Ian Chappell Statement on Jasprit Bumrah Rishabh Pant innings in Border Gavaskar Trophy Test Series sports news
बुमरा, पंतची लय महत्त्वाची; बॉर्डरगावस्कर मालिकेबाबत चॅपल यांचे विधान

हेही वाचा : “बायको Happy Anniversary”, शशांक केतकरच्या लग्नाला ६ वर्षे पूर्ण! पत्नीला म्हणाला, “चिडक्या, भावुक…”

सायली-अर्जुनची समजूत काढून सगळ्या मुली सारख्या नसतात असं त्याला सांगणार आहे याशिवाय त्याला जोडीदाराचं महत्त्व पटवून देणार आहे. सायली अर्जुनला सांगते, “आपल्या आयुष्यात जोडीदार फार महत्त्वाचा असतो सर, सगळ्या मुली सारख्या नसतात. त्यामुळे तुम्ही सुद्धा आपलं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज संपलं की, एखादी छानशी मुलगी पाहून लग्न करा.”

हेही वाचा : ‘आई कुठे काय करते’ फेम अनघाला मालिकेतील ‘या’ कलाकाराने दिलं हटके गिफ्ट! अभिनेत्री म्हणाली, “आणखी एक…”

सायलीचं बोलणं ऐकून अर्जुनला काहीच सुचत नसतं. कारण, सायलीप्रमाणे इतर कोणतीच मुलगी आपल्याला समजून घेणार नाही याबद्दल त्याच्या मनात खात्री असते. असं नव्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. एकंदर अश्विन प्रकरणामुळे अर्जुनला सायलीवर असलेल्या प्रेमाची जाणीव होईल का? ठरलं तर मग मालिकेत आगामी भागात आणखी काय ट्विस्ट येणार? हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.