बिग बॉस मराठी ५’चे पर्व संपले तरीही यामध्ये सहभागी झालेले स्पर्धक विविध कारणांमुळे सातत्याने चर्चेत असल्याचे पाहायला मिळते. वैभव चव्हाण आणि इरिना रुडाकोवा यांची बिग बॉसच्या घरात झालेल्या मैत्रीची चर्चा चांगलीच रंगताना दिसली होती. अनेकांनी गेमसाठी ही मैत्री असल्याचे म्हटले होते. मात्र, वैभव-इरिनाची ही मैत्री बिग बॉसच्या घराबाहेरदेखील असल्याचे पाहायला मिळत आहे. बिग बॉसच्या शोनंतर हे दोघेही अनेकदा एकत्र दिसतात.

वैभव आणि इरिनाच्या रोमँटिक व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया; म्हणाले, “यंदा उरकून टाका…”

सूरज चव्हाणने ‘बिग बॉस मराठी ५’ची ट्रॉफी जिंकल्यानंतर वैभव आणि इरिनाने त्याच्या घरी जात त्याची भेट घेतली होती. त्यानंतर ते दोघेही एकत्र धनंजय पोवारच्या घरी गेल्याचे पाहायला मिळाले होते. सोशल मीडियावर वैभव आणि इरिनाने पोस्ट शेअर करताना दिसतात. त्यांच्या या फोटो आणि व्हिडीओच्या पोस्टवर नेटकरी कमेंट्स करतानादेखील दिसतात. आता वैभव आणि इरिनाने शेअर केलेला व्हिडीओ चांगलाच चर्चेत असल्याचे दिसत आहे.

इरिना आणि वैभवने जिममधला एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा रोमँटिक व्हिडीओ असून, पार्श्वभूमीवर ‘ना देखो ना’ हे गाणे लावले आहे. त्यांचा हा व्हिडीओ नेटकऱ्यांना आवडत असल्याचे त्यांच्या कमेंट्समधून पाहायला मिळत आहे. नेटकऱ्यांनी कमेंट्स करत त्यांचे कौतुक केले आहे. एका नेटकऱ्याने लिहिले, “यंदा टाका उरकून मग.” दुसरा एक नेटकरी म्हणतो, “खरी ट्रॉफी तर हाच जिंकलाय.” आणखी एका नेटकऱ्याने, “उत्तम जोडी”, असे म्हटले आहे. एकंदरीत नेटकऱ्यांनी त्यांच्या जोडीचे कौतुक केले आहे.

आणखी काही नेटकऱ्यांनी, “बारामतीची सून, मस्त जोडी”, “ते अरबाज आणि निक्कीपेक्षा खूप चांगले आहेत”, “लई भारी”, बारामतीचे २ चव्हाण बिग बॉसमध्ये सर्वांवर भारी पडले, दोन ट्रॉफी दिल्या बारामतीला”, “फॉरेनची पाटलीण २”, अशा कमेंट्स केल्या आहेत.

बिग बॉसच्या पर्वात सहभागी झालेले पुरुषोत्तमदादा पाटील यांनीदेखील यावर कमेंट केली आहे. त्यांनी त्यांच्या कमेंटमध्ये इरिना आणि वैभवला टॅग करीत म्हटले, “लई भारी, खूप प्रेम”.

हेही वाचा: OTT वर उपलब्ध आहेत ‘हे’ थरारक सस्पेन्स थ्रिलर सिनेमे, चित्रपटांच्या रहस्यमय कथा ठेवतील खिळवून; पाहा यादी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, बिग बॉस मराठी ५ नंतर एका मुलाखतीत वैभव चव्हाणला त्याच्या आणि इरिनाच्या नात्याबद्दल विचारण्यात आले होते. त्यावर त्याने आमच्यात फक्त मैत्री आहे. ही मैत्री कायम अशीच राहू दे, अशी माझी इच्छा आहे, असे त्याने म्हटले होते.