ऑस्कर २०२४ साठी भारताची अधिकृत एंट्री म्हणून चित्रपटाची निवड झाली आहे. यंदा एका मल्याळम चित्रपटाची निवड भारतातर्फे ऑस्करसाठी करण्यात आली आहे. या चित्रपटाचे नाव ‘2018: Everyone is a Hero’ असे आहे. या चित्रपटात टोव्हिनो थॉमसची मुख्य भूमिका आहे. हा मल्याळम चित्रपट २०२४ च्या अकादमी पुरस्कारांसाठी भारताची अधिकृत एंट्री आहे.

आज कन्नड चित्रपट दिग्दर्शक गिरीश कासारवल्ली यांच्या नेतृत्वाखालील ज्युरीने ‘2018: एव्हरीवन इज ए हिरो’ चित्रपटाची निवड ऑस्करसाठी करण्यात आली आहे, अशी घोषणा केली. या चित्रपटाला नामांकन यादीत स्थान मिळाले तरच चित्रपट पुरस्कारासाठी पात्र ठरेल. ‘2018: एव्हरीवन इज अ हिरो’ हा चित्रपट केरळच्या काही भागात हाहाकार माजवणाऱ्या २०१८मध्ये आलेल्या पुराच्या पार्श्‍वभूमीवर आधारित आहे.

ऑस्कर २०२४ साठी मल्याळम चित्रपट ‘2018’ ला निवडण्यापूर्वी, ‘द केरला स्टोरी’ (हिंदी), ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’, ‘मिसेस चॅटर्जी विरुद्ध नॉर्वे’ (हिंदी), ‘बालगम’ (तेलुगु), ‘वाळवी’ (मराठी), ‘बापल्योक’ (मराठी) आणि ‘१६ ऑगस्ट १९४७’ (तमिळ) या चित्रपटांबाबत विचार सुरू होता. अखेर ‘2018’ ने बाजी मारली आणि या चित्रपटाला भारताकडून ऑस्करसाठी पाठवण्यात आलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ज्युड अँथनी जोसेफ दिग्दर्शित या चित्रपटात टोव्हिनो थॉमस, कुंचाको बोबन, आसिफ अली, विनीत श्रीनिवासन, नारायण आणि लाल यांनी महत्त्वाच्या भूमिका केल्या होत्या. ‘2018’ या वर्षी मे मध्ये रिलीज झाला होता. या सिनेमाला समीक्षकांकडून उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला आणि बॉक्स ऑफिसवरही तो हिट ठरला होता. हा आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा मल्याळम चित्रपट आहे आणि या वर्षातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या भारतीय चित्रपटांपैकी एक आहे.