आमिर खानचा ‘गजनी’ आजही आपल्याला चांगलाच लक्षात आहे. शॉर्ट टर्म मेमरी लॉस या आजारावर बेतलेल्या या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर लॉन्ग टर्म गारुड केलं होतं. खुद्द आमिर याच्या प्रमोशनसाठी रस्त्यावर उतरून लोकांना खास गजनी स्टाइल हेअर कट देत होता. तेव्हा या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली होती. मात्र या चित्रपटामुळे हॉलिवूडचा एक प्रसिद्ध दिग्दर्शक मात्र चांगलाच अस्वस्थ होता. आज तोच किस्सा जाणून घेणार आहोत.

२००५ साली मुर्गदास यांनी असिन आणि सुरिया यांना घेऊन तामीळ भाषेत ‘गजनी’काढला. जो प्रचंड गाजला आणि लोकांनी डोक्यावर घेतला. यानंतर २००८ मध्ये आमिर खानला घेऊन मुर्गदास यांनी ‘गजनी’चा हिंदी रिमेक केला आणि त्यालाही उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला. इतकंच नाही १०० कोटी इतकी कमाई करणारा हा पहिला हिंदी चित्रपट ठरला.

Marathi actor Ajinkya Deo play role in ranbir kapoor ramayan movie
अजिंक्य देव रणबीर कपूरच्या ‘या’ बहुचर्चित चित्रपटात झळकणार, व्यक्तिरेखेबाबत म्हणाले…
Salman Khan announces new film Sikandar on Eid
सलमान खानने चाहत्यांना दिली ‘ईदी’, नव्या चित्रपटाची केली घोषणा, दाक्षिणात्य दिग्दर्शक सांभाळणार दिग्दर्शनाची धुरा
crew movie review by loksatta reshma raikwar
Crew Movie Review : रंजक सफर
artificial intelligence in indian movie
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि भारतीय चित्रपट

आणखी वाचा : “मीदेखील पठाणची वाट पाहतोय” असं म्हणत हटके स्टाईलमध्ये शाहरुखने शेअर केला खास ‘पठाण’लूक

आमिरचं सगळेच कौतुक करत होते, पण हॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक क्रिस्तोफर नोलन हा मात्र या चित्रपटामुळे चांगलाच अस्वस्थ होता. गजनी हा चित्रपट २००० साली हॉलिवूडमध्ये बनलेल्या नोलनच्या ‘मेमेंटो’ या चित्रपटाशी साधर्म्य साधणारा होता आणि नोलनला याबद्दल माहिती होती. बॉलिवूड अभिनेते अनिल कपूर हे मध्यंतरी नोलनला भेटले असताना त्यांच्यात ‘गजनी’वरुन चर्चा झाली.

अनिल कपूर यांनी तो किस्सा आमिरलाही सांगितला. अनिल नोलनशी बोलत असताना नोलनने गजनीचा उल्लेख केला आणि तो चित्रपट मेमेंटोची कॉपी असल्याचंही त्याच्या कानावर आलं होतं. “चित्रपटाला एवढं यश मिळूनही माझा कुठेच उल्लेख नाही किंवा पैसेदेखील दिले नाहीत.” असं म्हणत नोलनने खेद व्यक्त केल्याचं अनिल कपूर यांनी सांगितलं.

यामुळे नोलन प्रचंड अस्वस्थ होता. ‘मेमेंटो’ हा त्याचा पहिला व्यावसायिक हिट चित्रपट होता. आपल्या भावाच्या लघुकथेवर नोलनने या चित्रपटाची कथा लिहिली होती. हा चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी प्रथम कुणीच पुढे येत नव्हतं. अखेर चित्रपटाच्या निर्मात्यांनी स्वतःच हा चित्रपट प्रदर्शित करण्याचं ठरवलं आणि २००० साली हा चित्रपट केवळ ११ चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. त्यानंतर पुढे या चित्रपटाने इतिहास रचला.