निसर्ग चक्रीवादळ अलिबागजवळ किनारपट्टीला धडकण्याची शक्यता असल्याने बुधवार ३ जून रोजी मुंबईहून सुटणाऱ्य़ा विशेष गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. तसेच मुंबईच्या आसपासच्या मार्गावरून जाणाऱ्या विशेष गाड्यांच्या मार्गातदेखील बदल करण्यात आली आहे. मध्ये रेल्वेकडून यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे.

या गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आले आहेत


दरम्यान, निसर्ग चक्रीवादळ उद्या किनारपट्टीला धडकण्याची शक्यता असल्याने बुधवार ३ जून व गुरुवार ४ जून रोजी मुंबई व कोकण किनारपट्टीवरील कार्यालये व उद्योग बंद राहतील, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले. दोन दिवस घरातच सुरक्षित थांबण्याचे आवाहनही त्यांनी केले.