मुंबई : मध्य रेल्वे उपनगरीय मार्गावर नऊ वर्षांपूर्वी पहिली १५ डब्यांची लोकल दाखल झाली. मात्र त्यानंतर आजतागायत या लोकलच्या फेऱ्यांमध्ये वाढ करणे रेल्वेला शक्य झालेले नाही. या लोकलच्या वाढीव फेऱ्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी आणखी तीन ते चार वर्षे लागण्याची शक्यता आहे. मध्य रेल्वेवर कल्याण यार्डचे नूतनीकरण, कल्याण-कसारा तिसरी-चौथी मार्गिका, कल्याण-बदलापूर तिसरी-चौथी मार्गिका सेवेत दाखल झाल्यानंतरच १५ डब्यांच्या लोकलची संख्या आणि फेऱ्या वाढू शकेल, असे मध्य रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मध्य रेल्वेच्या ताफ्यात सध्या दोन १५ डब्यांच्या लोकल आहेत. मध्य रेल्वेवर नऊ आणि नंतर १२ डब्यांच्या लाेकल धावत होत्या. दरम्यान, प्रवासी वाहून नेण्याच्या क्षमतेत आणखी वाढ करता यावी, तसेच लोकलचा प्रवास सुकर व्हावा यासाठी  २०१३ मध्ये १५ डब्यांच्या लोकल सेवेत दाखल करण्यात आली. १२ डब्यांच्या लोकलच्या तुलनेत १५ डब्यांच्या लोकलमधून प्रवासी वाहून नेण्याच्या क्षमतेत २५ टक्क्यांनी वाढ झाली.  त्यामुळे सुरुवातीला ही लोकल सीएसएमटी ते कल्याण मार्गावर धावत होती. या लोकलच्या १६ फेऱ्या होत होत्या. मार्च २०१९ मध्ये या फेऱ्यांमध्ये वाढ करण्यात आली आणि त्यात आणखी सहा फेऱ्यांची भर पडली. त्यामुळे दैनंदिन फेऱ्यांची संख्या २२ वर पोहोचली. मात्र तीन वर्षे उलटल्यानंतरही या फेऱ्यांमध्ये आणखी वाढ करता आलेली नाही.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 15 coach local rounds central railway suburban line mumbai print news ysh
First published on: 10-08-2022 at 11:11 IST