मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सातत्याने होत असलेल्या दमदार पावसामुळे धरणांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा जमा झाला आहे. सद्यस्थितीत सातही धरणांचा पाणीसाठा ७५.७९ टक्क्यांवर पोहोचला असून गतवर्षी तो केवळ २९.७३ टक्के होता. जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातच धरणे ७५ टक्के भरल्यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.

दरम्यान, सात धरणांपैकी एक असे मोडकसागर ९ जुलै रोजी ओसंडून वाहू लागले होते. मुंबईला ऊर्ध्व वैतरणा, मोडकसागर, तानसा, भातसा, विहार आणि तुळशी या सात धरणांतून दरदिवशी ३९०० दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा करण्यात येतो. या सातही धरणांची पाणी साठवण क्षमता १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर इतकी असून आता धरणांमध्ये १० लाख ९६ हजार ९५२ दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध आहे. यंदा जूनमध्ये समाधानकारक पाऊस पडल्याने मुंबईकरांची पाणीचिंता मिटली आहे.

कोणत्या धरणांत किती साठा?

उन्हाळ्यात धरणांतील पाणीसाठ्याने तळ गाठल्यामुळे मुंबईकरांना चिंतेत टाकले होते. पाणीटंचाईला तोंड द्यावे लागू नये, यासाठी महानगरपालिकेने राज्य शासनाकडे राखीव पाणीसाठ्याची मागणी केली होती. शासनानेही मागणी मंजूर केली होती. मात्र, जून व जुलैमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणांतील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. सद्यस्थितीत धरणांतील पाणीसाठा ७५.७९ टक्क्यांवर पोहोचला आहे.

गतवर्षी हे प्रमाण २९.७३ टक्क्यांपर्यंत घसरले होते. सद्यस्थितीत ऊर्ध्व वैतारणातील पाणीसाठा ६६.३८ टक्क्यांवर पोहोचला आहे. सद्यस्थितीत ऊर्ध्व वैतारणातील पाणीसाठा ७६.६४ टक्क्यांवर पोहोचला आहे. तसेच मोडकसागरमध्ये १०० टक्के, तानसामध्ये ८१.६६ टक्के, मध्य वैतारणामध्ये ९३.०९ टक्के, भातासामध्ये ६६.६१ टक्के, विहारमध्ये ४९.१६ टक्के आणि तुळशीमध्ये ५१.६९ टक्के इतका पाणीसाठा आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ९ जुलै रोजी सकाळी ६.२७ च्या सुमारास मोडकसागर धरण ओसंडून वाहू लागले होते. त्यापूर्वी ७ जुलै रोजी मध्य वैतरणा धरणाचे तीन दरवाजे ३० सेमीने उघडण्यात आले होते. संबंधित धरणाची पाणीपातळी २८२ मीटरहून अधिक वाढल्यामुळे धरणाचे पाणी मोडकसागरमध्ये सोडण्यात आले होते. परिणामी, मोडकसागर देखील तुडुंब भरून वाहू लागला. जुलै आणि ऑगस्ट हे सर्वाधिक पाऊस पडणारे महिने असल्यामुळे यंदा उर्वरित धरणे देखील लवकरच काठोकाठ भरण्याची शक्यता आहे.

तीन वर्षातील पाणीसाठा (पाणीसाठा दशलक्ष लिटरमध्ये)

  • १४ जुलै २०२५ – १०९६९५२ (७५.७९)
  • १४ जुलै २०२४ – ४३०२५९ (२९.७३)
  • १४ जुलै २०२३ – ४३००९७ (२९.७२)