मुंबई : देवनार कचराभूमीची जागा धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी देण्यासाठी अनेक वर्षांपासून साचलेले कचऱ्याचे डोंगर हटवून जमीन रिकामी केली जाणार आहे. राज्य शासनाच्या आदेशावरून महापालिकेने निविदा मागवल्या आहेत. एकूण १८५ लाख मेट्रीक टन कचऱ्याचे तब्बल ४० मीटर उंचीचे डोंगर असून ते हटवण्यासाठी २३६८ कोटी रुपये खर्च अंदाजित आहे. या कामासाठी किमान तीन वर्षे लागणार आहेत.

धारावीतील अपात्र रहिवाशांना सामावून घेण्यासाठी मुंबईत विविध ठिकाणची जमीन सरकार ताब्यात घेत आहे. देवनार कचराभूमीची १२४.३ एकर जागाही या प्रकल्पासाठी देण्याचा निर्णय सहा महिन्यांपूर्वी घेण्यात आला. तेथे गेल्या १०० वर्षांपासून कचरा साठला आहे. त्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करून जमीन रिकामी करून (पान ४ वर)(पान १ वरून) देण्याची मागणी धारावी पुनर्विकास प्रकल्प प्राधिकरणाने केली आहे. कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी मुंबई महापालिकेवर सोपविण्यात आली असून महसूल व वन विभाग विभागाने पालिका आयुक्तांना फेब्रुवारीमध्ये पत्र पाठविले. घनकचरा व्यवस्थापन विभागाने या कामासाठी आता ३ जूनपर्यंत निविदा मागवल्या आहेत. मुलुंड कचराभूमीप्रमाणेच कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी बायोमायनिंग प्रकल्पासाठी या निविदा आहेत.

कामाचा ‘ढीग’

कचऱ्याचे वजन १८५ लाख मेट

व्याप्त जागा ११० हेक्टर

एकूण अंदाजित खर्च २,३६८ कोटी

कंत्राट कालावधी तीन वर्षे (पावसाळ्यासह)

दररोजचे उद्दिष्ट २३ हजार मेट

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दररोजच्या वाहन फेऱ्या १२००